शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात असून उद्या (११ जुलै) यावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विधी तज्ज्ञ आणि प्रख्यात वकिलांच्या हवाल्याने म्हटलं की, “पक्षांतर बंदी कायदा आला तेव्हा त्यामध्ये कशाचा अंतर्भाव केला होता. त्याबाबत विधी तज्ज्ञ आणि प्रख्यात वकील आपापल्या परीने भूमिका मांडतात. या प्रकरणावर उद्याच्या ११ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काय निकाल लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हालाही तसंच वाटतंय किमान दिसताना तरी ते तसंच दिसतंय,” असं अजित पवार म्हणाले.

Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
anjali damania dhananjay munde
Anjali Damania: उद्या मी पुरावे मांडल्यानंतर फडणवीस, अजित…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Shivraj Rakshe
Shivraj Rakshe : “…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?
Woman with baby in babys belly gives birth safely
Maharashtra News LIVE Updates : गर्भाच्या पोटातही बाळ असलेल्या महिलेची यशस्वी प्रसूती; बाळाच्या पोटातील बाळाबाबत डॉक्टरांचं म्हणणं काय?
Shivraj Rakshe Mother Said This Thing
Shivraj Rakshe : शिवराज राक्षेच्या आईचा सवाल, “पंचांवर कारवाई का नाही? त्यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि…”
Petrol And Diesel Price on 3 february 2025
Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
Shivraj Rakshe Mahendra Gaikwad
पंचांशी हुज्जत, लाथ मारणं भोवलं! शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर कुस्तीगीर परिषदेची मोठी कारवाई
uddhav thackeray on nirmala sitharaman budget 2025
12 Lakh Income Tax: ‘एका सामान्य कुवतीच्या महिलेने…’, निर्मला सीतारमण यांचा उल्लेख करत ठाकरे गटाची टीका; १२ लाखांच्या मुद्द्यावर मांडली भूमिका!

पुढे त्यांनी सांगितलं की, “सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यानंतर दोन्ही बाजूने बोलणारे लोक असतात. हेही खरं आहे की, मी ज्या-ज्या वकिलांना विचारलं त्यातील बहुतेक वकिलांच्या मते, पक्षांतर बंदी कायद्याचं तंतोतंत पालन करायचं झाल्यास, १६ व्यक्तींबाबतचा निकाल वेगळा लागला पाहिजे,” असंही ते म्हणाले.

Story img Loader