Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून नावारुपाला आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून आगामी विधानसभेला सत्ताधाऱ्यांचे ११३ आमदार पाडू, असे आव्हान दिले होते. जरांगे पाटील यांचे टीकाकार आणि ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या छगन भुजबळ यांना याबद्दल नुकताच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना प्रतिआव्हान दिले आहे. मनोज जरांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करून दाखवावेत, तसेच माझ्या विरोधात येवल्यातून निवडणूक लढवावी, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ हे टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. मनोज जरांगेंच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, रोज रोज भूमिका बदलण्यापेक्षा मनोज जरांगेंनी २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचे कारण काय? कधी ते उपोषणाला बसतात, दुसऱ्या दिवशी उठतात. आता म्हणतात मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून देऊ. पण मुस्लिमांना २५ वर्षांपूर्वीच आम्ही आरक्षण दिलेले आहे. पण माहीत नसल्यामुळे जरांगे पाटील अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात. आता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुढे येणार आहेत. पण माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एकच काहीतरी करावे.

हे वाचा >> Devendra Fadnavis : “आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत?”, सूरतच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मला पाडण्यापेक्षा माझ्याच विरोधात उभा रहा

मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे विधान केले होते. या विधानाबद्दल प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, मला पाडण्यापेक्षा जरागेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवयच आहे. रस्त्यावर लढण्याची आणि सरकारमध्ये राहून काम करण्याची माझी तयारी आहे. येवला मतदारसंघात कुणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरागें पाटील यांनी काहीतरी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

छगन भुजबळ हे टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. मनोज जरांगेंच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, रोज रोज भूमिका बदलण्यापेक्षा मनोज जरांगेंनी २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचे कारण काय? कधी ते उपोषणाला बसतात, दुसऱ्या दिवशी उठतात. आता म्हणतात मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून देऊ. पण मुस्लिमांना २५ वर्षांपूर्वीच आम्ही आरक्षण दिलेले आहे. पण माहीत नसल्यामुळे जरांगे पाटील अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात. आता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुढे येणार आहेत. पण माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एकच काहीतरी करावे.

हे वाचा >> Devendra Fadnavis : “आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत?”, सूरतच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मला पाडण्यापेक्षा माझ्याच विरोधात उभा रहा

मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे विधान केले होते. या विधानाबद्दल प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, मला पाडण्यापेक्षा जरागेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवयच आहे. रस्त्यावर लढण्याची आणि सरकारमध्ये राहून काम करण्याची माझी तयारी आहे. येवला मतदारसंघात कुणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरागें पाटील यांनी काहीतरी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.