राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. पुरेसं संख्याबळ असताना देखील महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी पहाटे निकाल लागल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर सगळं उलट झालं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची समीकरणं कशी फिरली याबाबत बोलून दाखवलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर आणखी उलट झालं असतं. संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते, पण आमचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले.”

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

हेही वाचा- “…तर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपाला मतदान केलं असतं”, नवनीत राणा यांचा खळबळजनक दावा

मी स्वत: बैठकीत आमच्या आमदारांना निवडणुकीबाबत समजावून सांगितलं होतं. त्यासाठी अहमद पटेल यांचं उदाहरण देखील दिलं होतं. आपण दिलेलं मत आपल्या प्रतिनिधीला दाखवायचं आहे. पण ते दुसऱ्यांना दिसता कामा नये. अपक्षांनी कुठलंही मत कुणालाही दाखवता कामा नये. कागदावर कुठल्याही प्रकारची खूण, बिंदू किंवा वेडीवाकडी रेष असता कामा नये, हे सर्व नियम आम्ही आमच्या आमदारांना समजावून सांगितले होते.

महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार निवडून यावेत, म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण दुर्दैवाने आमच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. अर्थातच ज्या काही चर्चा सुरू आहेत, महाविकास आघाडीला धक्का वगैरे, असं काहीही नाहीये. महाविकासआघाडीने सरकार स्थापन करताना ज्यावेळी बहुमत सिद्ध केलं, तेव्हा आम्हाला १७० आमदारांचा पाठिंबा होता. आता दोन चार मतं इकडे तिकडे झाली आहेत. पण याचा अर्थ हा महाविकास आघाडीला मोठा धक्का नाही, असंही ते म्हणाले.

Story img Loader