एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी इंधन दरकपात करण्याचे संकेत दिल्यानंतर आज इंधन दरकपातीची घोषणा करण्यात आली. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र या घोषणेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. आज राज्याचे दर कमी केले असले तरी केंद्र सरकार दरवाढ करेल तेव्हा आजच्या दरकपातीचा काही उपयोग झाला नाही हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल असं पाटील म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> ‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…”
केंद्राने दरवाढ केल्यानंतर…
नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी इंधन दरकपातीवरुन शिंदे सरकारवर टीका केली. “शासनाने पेट्रोल डिझेलचे दर दोन रुपये, तीन रुपयांनी कमी केले आहेत. आज महाराष्ट्रात दोन आणि तीन रुपये दर कमी केले आहेत. थोड्या दिवसात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवेल त्यावेळी यांनी दर कमी करुन उपयोग झाला नाही हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल,” अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा