राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण केले आहेत. कोरोना संसर्ग हाताळणी, मंत्र्यांवरील भ्रष्ट्राचाराचे आरोप, नेत्यांमागे लागलेली राष्ट्रीय तपास संस्थांची अशी संकटे असताना महाविकास आघाडी सरकारने आपला निम्मा कार्यकाळ पूर्ण केला आहे. असे असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार का असे विचारल्यानंतर त्यांनी हे महाराष्ट्राची जनता ठरवेल; मी कसं ठरवणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राने पीक कर्जावरील व्याज परतावा परत सुरु करावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

Milind Gawali
मिलिंद गवळी यांनी १०३ वर्षे जुन्या ‘या’ वास्तूला दिली भेट; व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, “वेगळ्या विश्वात…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
pimpri leopard news in marathi
पिंपरी : निगडीत बिबट्याचा शिरकाव; अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद
Shri Mangalmurti s maghi Rath Yatra
श्री मंगलमूर्तींच्या माघी रथयात्रेचे चिंचवड येथून मोरगावकडे प्रस्थान
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
village in Jalgaon district where Yatra of bride and groom celebrated for many years
देव-देवतांची नाही तर ‘या’ गावात भरते चक्क नवरदेव-नवरीची यात्रा
Stampede at Maha Kumbh
Mahakumbh 2025 Stampede : कुणाची पत्नी हरवली, कुणी जखमी झालं तर कुणी…, चेंगराचेंगरी अनुभवणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

सुप्रिया सुळे काल (२९ मे रोजी) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील जनतेसोबत चर्चा केली. त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

हेही वाचा >> राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल होणार, शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राज्यात चांगला पाऊस पडू दे. बळीराजाचं राज्य येऊ दे असं साकडं तुळजाभवानीकडे घातल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा >> दगडूशेठ मंदिरात शरद पवारांनी दारातूनच दर्शन घेतल्यासंदर्भात विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सिद्धीविनायक मंदिरात जा आणि…”

दरम्यान, उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे यांचा ताफा मुस्लिम सामाजाच्या काही कार्यकर्त्यांनी अडवला होता. मुस्लिम समाजाला उस्मानाबाद दौऱ्यात स्थान न दिल्यामुळे हे कार्यकर्ते नाराज झाले होते, असं सांगण्यात येत आहे. नंतर या कार्यकर्त्यांची समजूत काढल्यांतर सुप्रिया सुळे यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला होता.

Story img Loader