Hasan Mushrif On Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या राजकीय नेतेमंडळी विविध मतदारसंघाचा दौरा करत कामाचा आढावा घेत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. मात्र, काही मतदारसंघात तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं आहे. “तिरंगी, चौरंगी कशीही लढत होऊ द्या, पण मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार”, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडीही स्थापन होण्याच्या चर्चांवरही भाष्य केलं आहे.

बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

हेही वाचा : Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“निवडणुकीच्या तोंडावर समाजामध्ये तेढ निर्माण करणं योग्य नाही. प्रत्येकाने आपल्या भाषेवर संयम ठेवला पाहिजे. ज्या पद्धतीने काही मंडळी बोलत आहेत, ते खेदजनक आहे. पण समाजामध्ये तेढ वाढवायचा नसेल तर संयम ठेवणं गरजेचं आहे”, असं मुश्रीफ यांनी म्हटलं.

तिसऱ्या आघाडीबाबत मुश्रीफ काय म्हणाले?

“मी याआधीही सांगितलं होतं की यावेळी बहुरंगी लढती होतील. आता कोणीही थांबायला तयार नाही. कारण ८ ते १० पक्ष झाले आहेत. मग तिसरी आघाडी होईल किंवा चौथी आघाडी होईल. आता या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारच उमेदवार उभे राहतील. बच्चू कडू यांचे दोन आमदार आहेत. एक ते स्वत: आणि त्याचे अजून एक आमदार आहेत. मात्र, बच्चू कडू यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते तिसरी आघाडी करु शकतात”, असं मुश्रीफ म्हणाले.

मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात…

समरजीत घाटगे यांना शरद पवार गटाकडून संपर्क साधल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर हसन मुश्रीफ म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. मला विचारुन काही उपयोग नाही. माझं ठरलेलं आहे की अजित पवार गट, आता माझा प्रचारही सुरु झालेला आहे. माझ्या विरोधात कोण उमेदवार असेल मी याची चिंता करत नाही. एकूण सहा निवडणुकीत तिरंगी लढत फक्त दोन वेळा झाली आणि चार वेळा एकास एक अशीच लढत झालेली आहे. यावेळीही एकास एक किंवा तिरंगी चौरंगी कशीही लढत होऊ द्या, पण मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार”, असं सूचक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

Story img Loader