कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांचा पराभव केला. संजय मंडलिक यांच्या पराभवानंतर महायुतीच्या नेत्यांनी बैठक घेत पराभवाची कारणमीमांसा केली. तसेच पराभवाची कारणं सांगत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विशेष ती काळजी घेण्यात येईल, असं कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांना जवळपास ६ लाख मते पडली आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना दिलेल्या मतदारांचे आभार मानायला पाहिजे. देशातील एकूण परिस्थिती पाहिली असता कोल्हापूर जिल्ह्यात काही पडझड झाली. कोल्हापूरमध्ये महायुतीची एक जागा निवडून आणण्यात आम्हाला यश आलं. मात्र, कोल्हापूरची जागा आम्ही निवडून आणू शकलो नाहीत. त्याला अनेक कारणे आहेत”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

हेही वाचा : संजय राऊत यांचा मोठा दावा! “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मविआ ‘इतक्या’ जागा जिंकणार”

हसन मुश्रीफ यांनी म्हटलं की, “संजय मंडलिक यांचा पराभव झाला, त्याला अनेक कारणं आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी असणं, मराठा आरक्षणाचा प्रश्न, कांदा प्रश्न, त्यानंतर आमचा एक शक्ती मार्ग गेला, यासह आदी कारणं या पराभवाला कारणीभूत ठरली आहेत. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही कारणमीमांसा करू आणि असे होऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेऊ”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

‘हा’ माझ्यासाठी धक्का

“महायुतीचे उमेदावर संजय मंडलिक यांना कागल विधानसभा मतदारसंघात १५ हजार मताधिक्य आम्ही राखलं. पण कागल विधानसभा मतदारसंघातून आम्हाला ७० ते ८० हजार मताधिक्य मिळ्याची आवश्यकता होती. असीच अडचण आणखी काही ठिकाणी झाली. संजय मंडलीक निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं. मात्र, त्यांचा पराभव झाला हा माझ्यासाठी धक्का आहे”, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

Story img Loader