अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. एवढंच नव्हे तर आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, अशा आशयाचं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलं आहे. या पत्रावर ४० आमदारांच्या सह्या असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या या कृत्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

मला अजित पवारांची मानसिकता महाराष्ट्राला सांगायची आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी टीकास्र सोडलं आहे. अजित पवारांनी पक्षावर ठोकलेल्या दाव्याबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला त्यांची (अजित पवार) मानसिकता महाराष्ट्राला सांगायची आहे. आपण जी राक्षसी महत्त्वकांक्षा म्हणतो, ती महाराष्ट्राला सांगायची आहे. त्या काकाला (शरद पवार) पूर्णपणे गिळून टाकायचं आहे, ही राक्षसी महत्त्वकांक्षा त्यांनी स्वत: महाराष्ट्रापुढे उघड केली आहे.”

Sharad Pawar
Sharad Pawar : “मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग…”, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
bjp pradipsinh Jadeja marathi news
अजितदादांच्या बालेकिल्ल्यावर गुजरात भाजपच्या नेत्याची नजर
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान

हेही वाचा- “कर्तृत्ववान मुलगा आपल्या म्हाताऱ्या बापाला…”, अजित पवारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

अजित पवारांना उद्देशून जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “तुम्ही किती तारखेला निवडणूक आयोगाकडे गेले होते? आणि किती तारखेला जाहीर केलं? तुम्ही १ किंवा २ जुलैला निवडणूक आयोगाकडे जाता आणि ५ जुलैला हे जाहीर करता. तोपर्यंत सगळं लपवून ठेवता. तुम्ही कायद्याच्या सगळ्या बाजू गुंडाळून या देशाला कोणत्या दिशेनं घेऊन जात आहात.”

हेही वाचा- शरद पवारांकडे संख्याबळ किती? बैठकीला कोणते आमदार-खासदार उपस्थित? पाहा संपूर्ण यादी

“मला या गोष्टीचं वाईट वाटतं की, ज्या शरद पवारांनी हा वटवृक्ष निर्माण केला. त्यालाच घरट्यातूनच बाहेर काढायचं. शरद पवारांनी तुमची कोणतीच महत्त्वाकांक्षा कधीच रोखली नाही. १९९० पासून मी सगळ्यांना बघितलं आहे,” असंही आव्हाड म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.