राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या विविध ठिकाणी नेते मंडळीच्या सभा, मेळावे सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे. या बरोबरच महाविकास आघाडी आणि महायुतीत विधानसभेच्या जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. आगामी विधानसभा निवडणूक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत.

आज कवठे एकंदमध्ये शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला. “राजकारण करायचं असतं पण कायमच नाही, आपलं घर, शेती सांभाळून राजकारण केलं पाहिजे”, असं शरद पवार यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.

Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

हेही वाचा : “एकाच वेळी मुसळधार पाऊस अन्…”, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शहर तुंबण्याचं कारण; स्थितीवर मात कशी करणार? म्हणाले…

शरद पवार काय म्हणाले?

“अनेक शेतकरी उसाचे पीक घेतात. उसाचं पीक घेत असताना एकदा ऊस लावण्यासाठी शेती तयार केली, सरी काढली, उस लावला की त्यानंतर पहिली बांधणी, दुसरी बांधणी करतात. तसेच खत-पाण्याची व्यवस्था केली की त्यानंतर साखर कारखान्याचा अधिकारी उसाची पाहणी करण्यासाठी कधी येतो आणि उसाच्या तोडीची तारीख कधी मिळते. याशिवाय आपण काही काम करत नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“उसाची शेती करत असताना सुरवातीचं काम केलं का? त्यानंतर शेतीकडे जास्त पाहायची आवश्यकता येत नाही. मग आपण जगभरातील राजकारणाच्या चर्चा गावाच्या ठिकाणी करत बसतो. मात्र, आपण हे पाहत नाही की आपल्या जमिनीचं नेमकं काय होतंय? पंचायत समितीची निवडणूक असो किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असो. यामध्ये आपण पुरेपूर लक्ष घालतो, म्हणजे यामध्ये लक्ष घालायला हरकत नाही. मात्र, तेवढं एकच काम आपल्याला असते का? राजकारण करायचं असतं, पण कायमचं नाही. आपले घर, शेती सांभाळून राजकारण करण्यात शहाणपण आहे. मात्र, अलिकडच्या काळात याची कमतरता पाहायला मिळते”, असं शरद पवार शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले.

Story img Loader