राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या विविध ठिकाणी नेते मंडळीच्या सभा, मेळावे सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे. या बरोबरच महाविकास आघाडी आणि महायुतीत विधानसभेच्या जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. आगामी विधानसभा निवडणूक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत.

आज कवठे एकंदमध्ये शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला. “राजकारण करायचं असतं पण कायमच नाही, आपलं घर, शेती सांभाळून राजकारण केलं पाहिजे”, असं शरद पवार यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.

Harshvardhan Patil
Harshvardhan Patil : भाजपाला धक्का! हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश, विधानसभा निवडणूकही लढवणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
BJP state president MLA Chandrasekhar Bawankule appeal to Uddhav Thackeray regarding election
“उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदारसंघातून जिंकून दाखवावे,” भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
sharad pawar loyalist jayant patil criticized amit shah narendra modi
मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे  घेतले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
Former MLA-activist abused each other in front of Congress National Secretary in Dhule
धुळ्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांसमोर माजी आमदार-कार्यकर्त्यांत शिवीगाळ
Nana Patole gave a reaction about becoming Chief Minister
नाना पटोले म्हणतात, “मी मुख्यमंत्री व्हावे…”

हेही वाचा : “एकाच वेळी मुसळधार पाऊस अन्…”, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शहर तुंबण्याचं कारण; स्थितीवर मात कशी करणार? म्हणाले…

शरद पवार काय म्हणाले?

“अनेक शेतकरी उसाचे पीक घेतात. उसाचं पीक घेत असताना एकदा ऊस लावण्यासाठी शेती तयार केली, सरी काढली, उस लावला की त्यानंतर पहिली बांधणी, दुसरी बांधणी करतात. तसेच खत-पाण्याची व्यवस्था केली की त्यानंतर साखर कारखान्याचा अधिकारी उसाची पाहणी करण्यासाठी कधी येतो आणि उसाच्या तोडीची तारीख कधी मिळते. याशिवाय आपण काही काम करत नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“उसाची शेती करत असताना सुरवातीचं काम केलं का? त्यानंतर शेतीकडे जास्त पाहायची आवश्यकता येत नाही. मग आपण जगभरातील राजकारणाच्या चर्चा गावाच्या ठिकाणी करत बसतो. मात्र, आपण हे पाहत नाही की आपल्या जमिनीचं नेमकं काय होतंय? पंचायत समितीची निवडणूक असो किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असो. यामध्ये आपण पुरेपूर लक्ष घालतो, म्हणजे यामध्ये लक्ष घालायला हरकत नाही. मात्र, तेवढं एकच काम आपल्याला असते का? राजकारण करायचं असतं, पण कायमचं नाही. आपले घर, शेती सांभाळून राजकारण करण्यात शहाणपण आहे. मात्र, अलिकडच्या काळात याची कमतरता पाहायला मिळते”, असं शरद पवार शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले.