विधानसभेची निवडणूक येत्या दोन ते तीन महिन्यांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने राज्यातील २८८ जागांवर सर्व्हे सुरु केला असल्याची माहिती सांगितली जाते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही सर्व जागांवर सर्व्हे करण्यात येत असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे येणाऱ्या आमदार आणि इच्छुक उमेदवारांची रिघ लागली आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

अनिल देशमुख काय म्हणाले?

खासदार सुनेत्रा पवार यांनी आज मोदी बागेत दाखल होत नेमकी कुणाची भेट घेतली? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावर अनिल देशमुख म्हणाले, “खासदार सुनेत्रा पवार या मोदी बागेत गेल्या असतील तर याबाबत मला काही माहिती नाही. मात्र, मोदी बागेत अनेक फ्लॅट आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोक राहतात. त्यामुळे त्यांनी कोणाची भेट घेतली याबाबत काही माहिती नाही. छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट का घेतली हे सर्वांना माहिती आहे. छगन भुजबळ हे आधी एक दिवस शरद पवार यांच्यावर टीका करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला जातात”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Mahavikas Aghadi Shiv Sena MP Supriya Sule
महाविकास आघाडीतील शिवसेना खासदार सुप्रिया सुळेंवर नाराज
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Anjali damania On Ajit Pawar
Anjali damania : अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; भेटीत काय चर्चा झाली? म्हणाल्या, “धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत…”
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका

हेही वाचा : ‘ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार’, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

देशमुख पुढे म्हणाले, “अजित पवार गट २८८ जागांचा सर्व्हे करणार आहे. पण याबाबात काही नवल वाटण्याचं कारण नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आम्हीही आमचा सर्व्हे करणार आहोत. सर्व्हे केल्यानंतर कोणती जागा कोणाला लढवायची याची माहिती समजते”, असंही देशमुख म्हणाले.

अजित पवारांनी निलेश लंके हे आमच्याकडून लोकसभा लढवण्यास तयार होते, असं विधान केलं होतं. त्यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “निलेश लंके यांना अजित पवारांनी शरद पवारांकडे पाठवण्याचा प्रश्नच नाही. निलेश लंके हे स्वत:च्या इच्छेने आले आहेत. त्यांना लोकसभा लढवायची होती, हे त्यांना माहित होतं. त्यांचा आधीपासूनच शरद पवार गटात येण्याचा ओढा होता. निलेश लंके शरद पवार गटात येणार होते, हे सर्वांना माहित होतं. आता ज्यावेळी निलेश लंके उमेदवार होते, त्यावेळी अजित पवार त्यांना काय काय बोलले? हे सर्वांना माहिती आहे. कसा निवडून येतो? पाहून घेईन, असं ते बोलले होते”, अशी टीका अनिल देशमुखांनी अजित पवारांवर केली.

तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर देशमुख म्हणाले, “भारतीय जनता पार्टीचा अजित पवार गटाला बाजूला करण्याचा प्रयत्न आहे का? अजित पवार गटापासून आपल्याला काही फायदा होत नाही मग त्यांना बाजूला करायचं. भाजपा सांगू शकते की, एकनाथ शिंदे तुम्ही वेगळं लढा आणि अजित पवार गट वेगळं लढेल. मग निवडून आल्यानंतर पाहू, कोणाची उपयुक्तता संपली तर भारतीय जनता पक्ष काहीही करु शकते”, असा हल्लाबोल अनिल देशमुखांनी केला.

आमच्याकडे उमेदावारांची रिघ लागली

“आमचा पक्षही २८८ जागांचा सर्व्हे करत आहे. यामुळे कोणत्या जागांचा बदल करावा लागेल, याचा आढावा आपल्याला या निमित्ताने येतो. तसेच मित्र पक्षांशी याबाबत योग्य ती चर्चा करता येते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे मोठ्या प्रमाणात आमदार किंवा इच्छुक उमेदावारांची रिघ लागली आहे. त्यामुळे सर्वांची चाचपणी करुन पक्ष योग्य तो निर्णय घेऊल”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Story img Loader