शिवसेना खासदार विनायक राऊत यांना बोलण्याच्या ओघात चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच विसर पडला. विनायक राऊतांनी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा उल्लेख केला आणि राजकीय वर्तुळात टीका-टिपण्ण्या सुरु झाल्या. दरम्यान, यानंतर आता विनायक राऊतांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या राणे यांना टीकेची मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे, या प्रकारानंतर निलेश राणे यांनी आता विनायक राऊतांवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून निलेश राणे यांनी विनायक राऊत यांची खिल्ली उडवली आहे.

“शिवसेना खासदार विनायक राऊत यांना अद्याप माहिती नाही की राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. टोपी तरी धड घालायची. नव्वदच्या दशकात सिनेमा टॉकीजच्या बाहेर तिकीट ब्लॅक करणारे जी टोपी घालायचे तशीच घातली आहे”, असं म्हणत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, विनायक राऊत हे शनिवारी (२ सप्टेंबर) सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यातील आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, प्रसारमाधम्यांशी बोलताना राऊत यांनी चक्क अशोक चव्हाण यांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री असा केला आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anna hajare
दारूच्या धोरणामुळेच अरविंद केजरीवाल यांना जनतेने नाकारले; अण्णा हजारे
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Image Of Bajran Sonawane
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण, बजरंग सोनावणे म्हणाले, “आरोपींना पैसे पुरवणारे…”

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत याचा एका शिवसेना नेत्यालाच विसर पडला आहे, अशी टीका सध्या राज्यभर होत आहे. मोठ्या उलथापालथी आणि अनपेक्षित राजकीय घडामोडींनंतर स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना विनायक राऊत यांच्यासारख्या बड्या नेत्याला याचा विसर पडल्याने या विधानाची खिल्ली देखील उडवली जात आहे.

Story img Loader