‘भारत जोडो’ यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रिटेनच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी हार्वर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात संबोधित केलं. तेव्हा राहुल गांधी भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. संसदेत नोटबंदी, जीएसटी, चीनबाबत बोलण्याची परवानगी दिली जात नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. आता यावरूनच भाजपा आमदार नितेश राणेंनी राहुल गांधींवर टीकास्र सोडत त्यांची दहशतवाद्यांशी तुलना केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. बाहेर देशांत भारताची बदनामी करून टाळ्या मिळवत आहेत. हे देशद्रोह्यासारखं आहे. म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला टाकला पाहिजे. जेवढा द्वेष पाकिस्तान करतो, तेवढाच राहुल गांधी करत आहेत. पाकिस्तान आणि राहुल गांधींची भाषा एकच असून, त्यांना देशाबाबत बोलण्याचा अधिकार नाही.”

bjp mp anil bonde made controversial statement on rahul gandhi over his reservation remark
राहुल गांधींच्‍या जिभेला चटकेच दिले पाहिजे….. आमदार  गायकवाडांनंतर आता  भाजपच्या ‘या’ नेत्याने थेट…..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
jaishankar, Jaishankar khata khat,
S Jaishankar : “आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही, इथे…”; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा राहुल गांधींना टोला!
Pakistan viral video Utter chaos as unruly mob loots mall in Pakistan's Karachi on opening day
कंगाल पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा; लोकांनी उद्धाटनाच्या दिवशीच मॉलमध्ये काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल
china condemns balochistan attacks support for pakistan s counter terrorism efforts
बलुचिस्तानमधील हल्ल्यांचा चीनकडून निषेध; पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईचे समर्थन
Why are there bloody attacks in Balochistan How is the government of Pakistan so desperate
विश्लेषण : बलुचिस्तानात रक्तरंजित हल्ले का होत आहेत? तेथे पाकिस्तान सरकार इतके हतबल कसे?
loksatta analysis how political instability in bangladesh adversely affecting Indian healthcare
विश्लेषण : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा विपरीत परिणाम भारतीय आरोग्यसेवेवर का होतोय?

हेही वाचा : हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड, देवेंद्र फडणवीसांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले…

“पाकिस्तान आणि राहुल गांधी…”

“राहुल गांधी ज्या घरात राहतात सुविधा वापरतात ते भारत सरकारच्या आहेत. त्याच भारताची तुम्ही बदनामी करत असाल, तर दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही. पाकिस्तान आणि राहुल गांधी एकच आहेत,” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

हेही वाचा : “…तर लोकसभेला कसे पराभूत झालात”, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

“भारतात लोकशाहीला वाचवण्यासाठी असलेल्या संस्था…”

दरम्यान, भारताबद्दल बोलताना राहुल गांधींनी सांगितलं होतं, “पूर्वी भारत असा नव्हता. त्या भारताचा आम्हाला प्रचंड अभिमान होता. पण, आताचा भारत बदलला आहे. भारतात लोकशाहीला वाचवण्यासाठी असलेल्या संस्था भाजपाने काबीज केल्या आहेत. आरएसएसमुळे केंद्र सरकारला वाटतं, भारत चीनबरोबर लढू शकत नाही. हेच म्हणणं परराष्ट्र मंत्र्यांकडूनही स्पष्ट करण्यात आलं,” असा टोला राहुल गांधींनी भाजपाला लगावला आहे.