उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याच कारणामुळे ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. आज (१८ ऑक्टोबर) नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपा तसेच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. मात्र भास्कर जाधव यांच्या याच टीकेचा समाचार आमदार नितेश राणे यांनी घेतला आहे. भास्कर जाधव हे खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का? हा संशोधनाचा विषय आहे, असे नितेश राणे म्हणाले आहेत. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा>>>> “अहो नारायण राणे, तुम्ही ३९ वर्ष…”, राणे पिता-पुत्रांची नक्कल करत भास्कर जाधवांचा खोचक टोला!

Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

“भास्कर जाधव म्हणतात मी शिक्षकाचा मुलगा आहे. मात्र मला तसे वाटत नाही. शिक्षकाचा मुलगा एवढा वात्रट निघेल, असे मला वाटत नाही. शिक्षक असलेल्या वडिलांनी त्यांच्यावर काय संस्कार केले असतील? भास्कर जाधव हे खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे,” अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा>>>> नितेश राणेंचे वैभव नाईकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! थेट कागदपत्रेच केली सादर

नितेश राणे यांनी नाईक यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चालाही लक्ष्य केले. “वैभव नाईक यांनी भ्रष्टाचार करायचा, बेहिशोबी मालमत्ता जमा करयाची. तर दुसऱ्यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढायचा, असे सुरू आहे. ते सगळे एकत्र येत आमच्यावर टीका करतात. यापेक्षा वैभव नाईक यांनी एसीबीला उत्तर द्यायला हवे. कुडाळ-मालवणच्या, सिंधुदुर्गच्या जनतेला मी निर्दोष आहे, हे सांगण्याची जबाबदारी नाईक यांची होती,” असेही नितेश राणे म्हणाले.

भास्कर जाधव काय म्हणाले होते?

नारायण राणेंवरील आरोपांचा संदर्भ देत भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखाना झाल्याचं भास्कर जाधव म्हणाले. “या तुमच्या जिल्ह्यातले कोंबडीवाले. त्यांनी रे रोडला एक प्रकल्प उभा केला. त्यात ३०० कोटींचा भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर ईडीची कारवाई व्हावी, म्हणून किरीट सोमय्यांनी तेव्हा आरोप केले होते. आज मंत्रीमंडळात बसलेले ५० टक्के लोक, मंत्रीमंडळाबाहेर आमदार असणाऱ्या लोकांवर भाजपाकडून असेच आरोप केले जात होते. पण तेच लोक भाजपात गेले आणि एकदम साफ, स्वच्छ झाले. भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांनी नारायण राणेंची नक्कल केली. “नारायण राणेंचं एकच कीर्तन असतं. ‘मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली’. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली म्हणताय.. ३९ वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात? तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेनं काहीच केलं नाही, तर ३९ वर्ष काम करून मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?” असा सवाल भास्कर जाधवांनी नारायण राणेंना केला आहे.

Story img Loader