राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागल मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने जानेवारी महिन्यात छापेमारी केली होती. शुक्रवारी याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. मुश्रीफांच्या पुणे आणि कोल्हापूर येथील घरांवर शुक्रवारी ईडीने धाडी टाकल्या. या छापेमारीनंतर विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपा नेते ही छापेमारी कशी योग्य आहे ते सांगत आहेत.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांना या छापेमारीबद्दल विचारले असता राणे म्हणाले की, “ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभाग या संस्था भाजपाच्या काळात जन्माला आल्या आहेत का? या संस्था यूपीएच्या काळापासून चालत आल्या आहेत. एसआयटीने पूर्वी नरेंद्र मोदींची चौकशी केली होती. भाजपा नेत्यांवर सीबीआय आणि ईडीच्या धाडी पडायच्या, त्यांचीदेखील चौकशी झाली आहे.”

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

राणे म्हणाले की, “हे अधिकारी केवळ चौकशी करतात, विचारपूस करतात, त्यांना एखादं आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण सापडलं असेल म्हणून मुश्रीफांवर ही छापेमारी सुरू असेल. आर्थिक गैरव्यवहार सापडल्याशिवाय ईडी अशी छापेमारी करू शकत नाही. कोणाला याची अडचण असेल तर त्यांनी कोर्टात जावं. तुम्ही चोरी केली असेल, भ्रष्टाचार केला असेल तर तुमच्याकडे ईडीचे अधिकारी चहा प्यायला येणारच.”

हे ही वाचा >> व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला दीड तास मारहाण, मग प्रायव्हेट पार्ट पेटवले, आजारामुळे गेल्याचे सांगत अंत्यविधी उरकले, पण…

मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे का…? : नितेश राणेंचा सवाल

नितेश राणे म्हणाले की, या संस्था भाजपाने जन्माला घातलेल्या नाहीत. या संस्था आधीपासूनच आहेत. गैरव्यवहार झाला असेल तर चौकशी करतात, तपास करतात, त्यात काही सापडलं नाही तर सोडून देतात. तुमच्या नेत्यांवर तुमचा विश्वास नाही का? हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे का, की त्यांनी गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार केला आहे. त्यांना अटक होणार असा काही गैरसमज आहे का?

Story img Loader