महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा घ्यायला नको अशा आशयाचं पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी UGC ला लिहिलं आहे. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव ज्या प्रकारे वाढतो आहे तो लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि हिताच्या दृष्टीने आम्ही विचार करतो आहोत. अशा परिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नाही हेदेखील आम्ही UGC ला कळवलं आहे असंही उदय सामंत यांनी सांगितलं. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जो संवाद साधला त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No exams for final year also maharashtra government minister wrote a letter to ugc scj
First published on: 19-05-2020 at 18:00 IST