राज्यात रिपाइंचे अस्तित्वच उरलेले नसल्याने महायुती जागा वाटपाबाबत टाळाटाळ करीत असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जत येथे बुधवारी सांगितले.
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले महायुतीमध्ये सामील झाले. मात्र त्यांच्या वाटय़ाच्या जागांची मागणी वारंवार करून ही भाजप व शिवसेनेचे नेते टाळाटाळ करीत आहेत. हा संदेश म्हणजे ‘देतो तेवढे घ्या अन्यथा तुमची गरज नाही’ असा आहे. जर महायुतीला रिपाइंची गरज असती, तर यापूर्वीच जागा वाटप झाले असते.
श्री. आंबेडकर यांनी सांगितले, की मोदी नावाच्या अजगरला काँग्रेस घाबरत असून लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्या आघाडीचीच केंद्रात सत्ता असेल. पुढील पंतप्रधान हा काँग्रेस अथवा भाजपचा नसेल मात्र या सर्वोच्च पदाचा हक्क तिसऱ्या आघाडीलाच प्राप्त होईल असे सांगून ते पुढे म्हणाले, की पुढचा पंतप्रधान प्रादेशिक पक्षाचे मुख्यमंत्रीच ठरवतील.
राज्यात रिपाइंचे अस्तित्वच नाही – प्रकाश आंबेडकर
राज्यात रिपाइंचे अस्तित्वच उरलेले नसल्याने महायुती जागा वाटपाबाबत टाळाटाळ करीत असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जत येथे बुधवारी सांगितले.

First published on: 10-10-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No existence to rpi in state prakash ambedkar