सोलापूर जिल्ह्य़ात काही भागात अवकाळी पाऊस होऊन विजा कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यात ही दुर्घटना घडली. अक्कलकोटजवळ अवकाळी पावसात वादळी वा-यांमुळे दगड अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला.
मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे तनवीर पैगंबर तांबोळी (८) हा मुलगा मरण पावला. तर अर्जुनसोंड येथे सीताबाई हणमंत ढेरे (३७) व नंदा जयंत धावणे (४२) या शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे अवकाळी पाऊस वादळी वा-यांमुळे घरावरील छतावरील दगड अंगावर पडल्याने श्रीदेवी चन्नप्पा पाटील (४२) ही महिला मृत्युमुखी पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odd time rain 4 killed due to lightning