महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष गेलं. मात्र निवडणुका घेण्याची हिंमत बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. पैसा उधळला जातो आहे, जाब विचारणारं कुणी नाही. पावसाप्रमाणे निवडणुकाही लांबत चालल्या आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुंबईला कुणी मायबापच राहिलेला नाही. जे काही सुरु आहे ते लुटालूटच आहे. शिवसेना आता महापालिकेवर १ जुलैच्या दिवशी विराट मोर्चा काढणार आहे अशीही घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

१ जुलैला शिवसेनेचा विराट मोर्चा

मुंबई महापालिकेच्या ठेवींमधूनच विकासकामं केली जात आहेत. आत्तापर्यंत बराच पैसा याच एफडींमधून वापरला गेला आहे. हा सगळा जनतेचा पैसा आहे. या जनतेच्या पैशांच्या लुटीचा हिशोब द्यावाच लागेल. १ जुलैला आम्ही विराट मोर्चा काढणार आहोत. मुंबईकरांच्या मनातल्या असंतोषाला आम्ही वाचा फोडणार आहोत. या सगळ्यांना जाब विचारणारं कुणी नाही. एक काळ असा होता की मुंबई महापालिका ही ६५० कोटी तुटीत होती. आता ९२ हजारांच्या ठेवीपर्यंत ही मुंबई महापालिका गेली आहे. हे सगळे पैसे महापालिकेच्या ठेवी होत्या. कोस्टल रोड, जनतेच्या उपयोगाची कामं सुरु होती. आता कोणतंही काम असेल तरीही महापालिकेचा पैसा बेधडकपणे वापरला जातो आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृ्त्त्वात हा मोर्चा निघणार आहे.

Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
ed file case against four people including executive chairman of religare
ईडीच्या तक्रारीवरून ‘रेलिगेअर’च्या कार्यकारी अध्यक्षांसह चौघांविरोधात गुन्हा, बर्मन कुटुंबाविरोधात खोटी माहिती दिल्याचा आरोप
High Court, Badlapur Police, Badlapur Police investigation,
आणखी एका प्रकरणाच्या तपासावरून बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
Former MP Chandrakat Khaire statement on the Malvan statue disaster print politics news
महापुरुषांच्या पुतळ्यांची मोडतोड झाली तर दंगली होतात; चंद्रकांत खैरे यांचे वादग्रस्त विधान, महायुतीची टीका
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
पुणे: एमपीएससीच्या स्वायत्ततेतील हस्तक्षेपावर सतेज पाटील यांची टीका, म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ…’
Chandrapur, Wekoli, electronic weighing machine, fraud, crores of rupees loss, electronic chip, Ramnagar police, Faiz Traders, Vekoli employees,
चंद्रपूर : वजन काट्यात चीप लावून गैरप्रकार, वेकोलीच्या चार जणांविरूध्द गुन्हा
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार

माझ्या कानावर असं आलं आहे की सात ते आठ हजार कोटी त्या एफडीमधून वापरले गेले आहेत. या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल. येत्या १ जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा आम्ही काढणार आहोत अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. आत्ता हे जे बेकायदेशीर सरकार सांगतं आहे ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. चोरच चोर-चोर ओरडू लागला की लोक दुसरीकडे पाहू लागतात तसं हे सरकार करतं आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

गद्दार कितीही काहीही झालं तरी गद्दारच राहणार. लोकांच्या मनात यांच्याविरोधात असंतोष आहे त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. त्यांच्या नेत्यांवर जे आरोप होत आहेत त्यांना क्लिन चीटच मिळत आहेत याला काहीही अऱ्त नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.