होळी निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त १०० जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला असून, १६ ते २७ मार्च २०२२ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, तसेच एसटी संपाचा गैर फायदा घेवून खासगी बसेस प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारत आहेत, याबाबत प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्यादा भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करणाऱ्यांवर परिवहन आयुक्त यांनी दोषींवर कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिले.

होळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी जात असतात. एसटी महामंडळाचा संप काही ठिकाणी अद्याप सुरू असल्याने खासगी बसेस प्रवाशांची अडवणूक करुन अधिक दर आकारत आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची परिवहनमंत्री यांनी तातडीने दखल घेवून याबाबत परिवहन आयुक्त यांनी तपास पथक अधिक नेमून कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले.

new education policy, secularism,
विद्यार्थ्यांतून शिधायोजनांवर विसंबून राहणारा वर्ग घडवायचा आहे का?
Health care also has a different system of advertising
आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल
sant nivrittinath alkhi welcomed with enthusiasm in nashik
नाशिककरांतर्फे संत निवृत्तीनाथ पालखीचे उत्साहात स्वागत
Reliance Jio provides offers a range of prepaid data booster plans to keep users connected without interruptions checkout list
Reliance Jio Down : इंटरनेट सेवा खंडीत झाल्याने ग्राहकांच्या तक्रारींचा पूर, जिओ फायबरही काम करेना!
jail, company, entrepreneurs,
तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंद करू, डोंबिवली एमआयडीसीतील युवा उद्योजकांची उव्दिग्नता
Gold Silver Price 18 June
Gold-Silver Price: दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोने झाले स्वस्त, दर पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद
Discount deals Tata cars drop pricDiscount deals Tata cars drop prices by up to Rs 60000
बचतची मोठी संधी! टाटा मोटर्सच्या ‘या’ कारवर मिळतेय भन्नाट ऑफर
Top 5 Cars With Sunroof Under 10 Lakhs Tata Mahindra Hyundai
Top 5 Cars With Sunroof Under 10 Lakhs: टाटा, महिंद्रा, ह्युंदाईच्या ‘या’ सनरूफ असलेल्या कार १० लाखांहून कमी किंमतीत आणा घरी

गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील आगारांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्यासाठी वाहतूक विभागाने पूर्ण तयारी केली असून पुणे, सातारा, सांगली आदी भागातून जादा बसेस मागविण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांचे नियोजन करण्यासाठी आगारांत एसटीचे अधिकारी व पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे सांगून सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही अनिल परब यांनी केले आहे.