रत्नागिरी : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळून झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचा चालक फरार आहे. याबाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री कोल्हापूरहून जयगडकडे चाललेल्या ट्रकमध्ये (एमएच ११- डी डी ०९६७) रत्नागिरीकडे जाणारे काही प्रवासी बसले होते. ट्रक आंबा घाटात आला असता एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक घाटातील डाव्या बाजूच्या डोंगरकडय़ावर जोरात आदळला. ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या महिला सोनाबाई सखाराम लावनदे (वय ५८ वर्षे) या अपघातामध्ये ठार झाल्या, तर ज्योतिबा बाबुराव लवनदे, (वय ५२) गंभीर जखमी झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा