मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम २४ ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे २४ तारखेला सरकार मराठा समाजाला आरक्षण जाहीर करतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला.

“मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशा आहे. सरकार २४ तारखेला आम्हाला आरक्षण देणार. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान राखून त्यांचा सन्मान केला आहे. आता त्यांनी त्यांच्या शब्दाचा मान राखून आमचा सन्मान करावा. गाफिलपणे राहून मराठा समाजाचा अवमान करू नये”, असं मनोज जरांगे म्हणाले.

high court clarifies akshay shinde encounter case hearing continues parents not required to attend
औक घटकेसाठी एपीएमसी सभापती, उपसभापतींची निवडणूक, दोन आठवड्यात निवडणूक घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Inquiry , Beed District Planning Committee, Beed ,
बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी, दोन वर्षांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
high court ordered election notification in one month and imposed restrictions on Chandrapur District Banks board
हायकोर्टाच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ नामधारी; एक महिन्यात…
कोल्हापूर विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया रखडली; सतेज पाटील, लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
rte 25 percent admission process initially ending on January 27 is now extended to February 2
आरटीईसाठी १४ ते २७ जानेवारी पर्यंत ३१ हजार अर्ज प्राप्तप्रवेशासाठी, २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
SEBI Chairperson Madhavi Puri Buch last month in office print eco news
‘सेबी’च्या नव्या अध्यक्षांचा अर्थमंत्रालयाकडून शोध सुरू; माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळाचा शेवटचा महिना

हेही वाचा >> “कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”, राणेंच्या विधानावर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “आजोबा- पंजोबा…”

मराठा आरक्षण समितीने अजून दोन महिन्यांचा अवधी मागितली आहे. हा दोन महिन्यांचा अवधी देणार का? असा प्रश्न जरांगे पाटलांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, समितीने कितीही वेळ मागुद्यात. पण सरकार आणि मुख्यमंत्री वेळ वाढवून देणार नाहीत. मुख्यमंत्री २४ तारखेला आरक्षण देणारच. तीस दिवसांऐवजी ४० दिवसांचा अवधी देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मराठा समाजाला कधीच दगाफटका करणार नाहीत.

हेही वाचा >> भाजपा-शिवसेना युतीबद्दल काय वाटतं? नितीन गडकरींचं मजेशीर उत्तर, प्रेक्षकही खळखळून हसले!

आत्महत्या करू नका

“महाराष्ट्रातील समाजाला आणि तरुणांना मी विनंती करतो की मरण्यापेक्षा लढा. आत्महत्या करायची नाही. आत्महत्या करून स्वतःचं कुटुंब उघड्यावर पडायला लागली आहेत. एकानेही आत्महत्या करायची नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाने घराघरात सांगा की आत्महत्या कोणी करायची नाही. तुम्ही आत्महत्या केली तर आरक्षण कोणाला द्यायचं? त्यापेक्षा लढा ना. आत्महत्या करून तुमचंच कुटुंब उघड्यावर पडणार आहे. आपल्या आई-बापाकडे कोणी लक्ष देत नाही, आपल्या मुलांकडे कोणी लक्ष देत नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात. आपण त्यांच्या रक्ताचे वंशज आहोत, आपण छत्रपतींचे वंशज असल्याने आपण लढायचं आहे. मरायचं नाही. आत्महत्येने एक माणूस कमी होतोय. आपली माणसं वाढली पाहिजेत, आपली शक्ती वाढली पाहिजे. आपण लढू पण आत्महत्या करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कधीच आत्महत्या करत नव्हते”, असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठा समाजातील तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे.

Story img Loader