राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप झाले. शिवसेनेत शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरले होते. अजित पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत हे दोन्ही अधिवेशन गाजवले होते. तर, विधान परिषदेत अमोल मिटकरी, अंबादास दानवे यांनी जोरदार बॅटिंग केली होती. परंतु, महाविकास आघाडीच्या बाजूने आक्रमक ठरलेले सदस्य आता सरकारमध्ये सामील झाल्याने यंदाचे पावसाळी अधिवेशन गाजेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. बहिष्कार घालण्यामागचे कारणही विरोधी पक्षाने आज पत्रकार परिषद घेऊन विषद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा