पालघर साधू हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यास महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. तसे शपथपत्र सरकारने न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणात याआधी साधारण २०० लोकांना अटक करण्यात आली होती. पुढे नोव्हेंबर २०२२ मध्ये अटक करण्यात आलेल्या ५८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तर डिसेंबर २०२० मध्ये यातील ४७ आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. याआधी आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी सीआयडीने ८०८ संशयितांची चौकशी करण्यात केली होती. तसेच १०८ साक्षीदारांचा जबाब नोंदवला होता.

Maharashtra Electricity Employees Engineers Officers Committee announced a strike
नागपूर:कर्मचारी संपामुळे वीज संकटावर महत्वाची अपडेट.. कृती समिती म्हणते…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Asmita Patil suicide case investigation is necessary Jayant Patil request to Police Commissioner
अस्मिता पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी गरजेची, जयंत पाटील यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
controversy regarding Siddesh Kadam Mercedes visit Inconsistencies in Maharashtra Pollution Board claims pune print news
सिद्धेश कदम यांच्या मर्सिडीज भेटीचे गौडबंगाल! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या दाव्यात विसंगती; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन
fake proposal submitted by Public Works Department for MLA fund
नाशिक : बनावट प्रस्तावविषयी सार्वजनिक बांधकामकडे संशयाची सुई , चौकशी करून कारवाईचे निर्देश देण्याची तयारी
Raigad Police recruitment,
रायगड पोलीस भरती कॉपी प्रकरणाची व्याप्ती वाढली, राज्यभरातून दहा जणांना अटक, स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई
dispute on vasant kanetkar literature copyright
प्रा. वसंत कानेटकर लिखित अप्रकाशित संहितेच्या हक्कावरुन वाद
maharashtra government to grant rs 1600 crore to cotton and soybean farmers
कापूस, सोयाबीन उत्पादकांना १६०० कोटींची मदत

नेमकं प्रकरण काय आहे?

१६ एप्रिलच्या 2022 रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. यातील ११ आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्याप्रकरणात पाच पोलिसांचे निलंबन तर ३० हून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.