१६ एप्रिल रोजी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातून जवळपास १० लाख श्री सेवक उपस्थित होते. या श्री सेवकांना सुमारे सात-आठ तास उन्हात बसवून ठेवल्याने १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आमने-सामने आले.

या कार्यक्रमाचे आयोजक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधकांनी केली. याप्रकरणी आता शैला कंठे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून खारघर प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कंठे यांनी आपल्या याचिकेत केली आहे. याबाबतचं वृत्त ‘बार अँड बेंच’ने दिलं आहे.

Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pil filed in High Court demanding ED inquiry into Valmik Karad accused in Santosh Deshmukhs murder
वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांच्या ईडी चौकशीचे आदेश द्या, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी
Jitendra Awhad on Badlapur case akshay shinde
“अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”, बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा!
resident , feeding stray dogs, stray dogs,
भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखू नका, उच्च न्यायालयाचे नवी मुंबईस्थित गृहनिर्माण संस्थेला आदेश
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”

“खारघर येथील कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानगरपालिका आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त यांना खारघर येथील वाढत्या तापमानाची कल्पना होती. तरीही त्यांनी सरकारी तिजोरीतील १४ कोटी रुपये खर्च करून उपस्थित नागरिकांसाठी अयोग्य व्यवस्था केली. श्री सेवकांना सात ते आठ तास उन्हात बसवून ठेवलं. त्यामुळे संबंधित १४ जण उष्माघाताचे बळी ठरले,” असं शैला कंठे यांनी याचिकेत म्हटलं आहे.

निष्काळजीपणा आणि अयोग्य व्यवस्थेमुळे ही दुःखद घटना घडल्याचा आरोप कंठे यांनी केला. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली. हा कार्यक्रम आयोजन करून राज्य सरकारने लोकांच्या पैशांचा अपव्यव केला, असंही त्यांनी याचिकेत म्हटलं. त्यांनी वकील नितीन सातपुते यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे.

Story img Loader