पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. वाढवण बंदर प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आहे. या वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ आहे. या बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी माफी मागितली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात गेले”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे नाव न घेता टीका केली.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
What Jitendra Awhad Said?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा टोला, “…तर धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नेहमी बोललं जातं. त्यांचा अपमान केला जातो. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करूनही माफी तर मागितली नाहीच. मात्र, ते न्यायालयामध्ये जातात. त्यांना कधीही याबाबत पश्चात्ताप झाला नाही किंवा होत नाही. कारण हे त्यांचे संस्कार आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या संस्कारांना चांगलं ओळखते. पण आमचे संस्कार वेगळे आहेत”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर नाव न घेता हल्लाबोल केला.

मोदी पुढे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी जे काही घडलं ते दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो”, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली.

महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचं एक केंद्र बनेल

“आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे. विकसित महाराष्ट्रात विकसित भारताच्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच मागच्या १० वर्षात असो किंवा सरकारचा तिसरा कार्यकाळ असो. आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रात देशाच्या विकासाची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच आज वाढवण बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं. या बंदरासाठी जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचं एक केंद्र बनेल”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

काही लोकांकडून महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न

“२०१४ आधी वाढवण बंदराचं काम रोखून धरण्यात आलं होतं. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पावर काम सुरू केलं. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली. मात्र २०१९ साली आमची सत्ता गेली, तेव्हा अडीच वर्ष पुन्हा प्रकल्पाचे काम रखडलं. या एकाच प्रकल्पामुळे १२ लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एवढी मोठी गुंतवणूक कुणी रोखून धरली, हे महाराष्ट्राच्या जनतेने विसरू नये. काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्राला देशात नंबर एकच राज्य बनवायचं आहे”, असंही ते म्हणाले.

Story img Loader