सांगली : मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी केली.

विट्यात आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी उद्योग मंथन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, शंकरनाना मोहिते, केमिस्ट असोसिएशनचे विजय पाटील आदी उपस्थित होते.

SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Rajnath singh and pannun
Pannun Threat Rajnath Singh : खलिस्तान समर्थक पन्नूकडून थेट भारताच्या संरक्षण मंत्र्यांना धमकी, थेट शासकीय निवासस्थानी केला फोन!
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Pune, Crime, Cop-24 , Police Patrol,
पुणे : रस्त्यांवरील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘कॉप – २४’, पोलिसांकडून आता अहोरात्र गस्त; ७२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
Sanjay Raut claims to contest Mumbai Municipal Corporation elections on his own Mumbai news
मुंबई महापालिका स्वबळावर, अन्य ठिकाणी मविआ; संजय राऊत यांचा दावा
police arrest bangladeshi nationals residing illegally In dombivli kalyan
डोंबिवली, कल्याणमध्ये घुसखोर बांग्लादेशी नागरिक अटक

आणखी वाचा-जालन्यातील घटनेचे हिंगोलीत तीव्र पडसाद; जमावाने सरकारी गोदामाला लावली आग, लाखोंचं नुकसान

यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, आर्थिक निकषावर आधारित मराठा समाजाला आरक्षणाची मागणी सर्वात प्रथम १९८२ मध्ये स्व. अण्णासाहेब पाटील यांनी केली होती. या मागणीसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. तेव्हापासून मराठा समाजाचा आरक्षण मागणीसाठीचा लढा सुरू आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, आर्थिक उन्नती साधावी एवढीच आमची मागणी आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे आंदोलन करणारा मनोज जारांगे पाटील हा युवक गेल्या चारपाच वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. चुकीच्या पध्दतीने तो काही करणारा नाही. आंदोलकांवर लाठीहल्ला, गोळीबार करण्यासारखी स्थिती नसतानाही असे आदेश देणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचे श्री. पाटील म्हणाले.

Story img Loader