कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सत्ताधारी या रिफायनरीचं समर्थन करत आहेत. तर विरोधक बारसूतल्या ग्रामस्थांशी बोलून विषय सोडवावा या भूमिकेत आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या रिफायनरीला थेट विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकर शनिवारी रात्री माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इतकंच सांगतो की, कोकणाची वाट लावू नका.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एन्रॉनलाही आमचा विरोध होता. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इतकंच सांगतो की कोकणाची वाट लावू नका. बारसूबद्दलच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल आंबेडकर म्हणाले की, राज्यातले नेते केंद्रातून फोन आल्यावर त्यांच्या भूमिका बदलतात. नंतर म्हणतात ही भूमिका आमची नाही. आंबेडकर म्हणाले, मुळात कोकण हे लाईफ सेंटर आहे. इथे मिळणारा ऑक्सिजन हा १०० टक्के शुद्ध आहे.

manoj jarange patil criticized devendra fadnavis
“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Akola connection in murder case of Baba Siddiqui leader of NCP Ajit Pawar group
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे अकोला ‘कनेक्शन’? जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोस्टमुळे…
Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
Dr. Babasaheb Ambedkar
Anna Sebastian: कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कायद्यात केलेल्या सुधारणा या निमित्ताने चर्चेत!

हे ही वाचा >> Bhiwandi Building Collapsed: भिवंडीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; ९ जखमी, दहा-बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे लोक (सत्ताधारी) म्हणतात, बारसूत रिफायनरी बनल्याने रोजगार मिळतील. येथे इंडस्ट्री येऊन इथल्या लोकांचा रोजगर वाढेल. परंतु त्यापेक्षा कोकणातील नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं गेलं तर कोकणातील लोकांचा व्यापार वाढेल. त्यावर चालणारे उद्योग वाढतील. त्यांना पाठबळ दिलं तर तेलंगणाच्या लोकांचा मासिक उत्पन्न वाढलं तसंच कोकणातील लोकांचंही वाढेल.