वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अलिकडेच छत्रपती संभाजीनगर येथील मुघल बादशाह औरंगजेब याच्या कबरीवर फुल वाहिली होती. त्यामुळे मोठा गदारोळ सुरू झाला होता. प्रकाश आंबेडकरांवर हिंदुत्ववादी पक्षांकडून आणि संघटनांकडून टीका सुरू आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आंबेडकर यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची मतं व्यक्त केली.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रकाश आंबेडकरांना विचारलं की, तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन अभिवादन का केलंत? त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी अभिवादन केलं म्हणजे त्याच्या कबरीवर फुलं वाहिली. आंबेडकरांच्या उत्तरानंतर त्यांना विचारण्यात आलं की, औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यामागे तुमचं नेमकं काय उद्दीष्ट होतं? त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात चुकीच्या कथा सांगितल्या जात आहेत. देशात होऊन गेलेल्या राजांच्या खोटा इतिहास सांगून धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. औरंगजेबावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा काहींचा बेत होता, तो मला थांबवायचा होता, माझ्या त्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं आणि औरंगजेबाच्या निमित्ताने जी दंगल होणार होती ती थांबली.

Vanchit Bahujan aghadi agitation against senior literary figure in Nagpur
नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या विरोधात वंचितचे आंदोलन, निवासस्थानी पोलीस तैनात
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
praskash ambedkar vidhansabha election support
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा कुणाला? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
A JD(U) leader said there was no pressure from the BJP and the decision was taken suo motu by Nitish Kumar. (Express file photo)
K C Tyagi : जदयूच्या के. सी. त्यागींना स्पष्टवक्तेपणा भोवला? प्रवक्तेपदाची सोडचिठ्ठी एनडीएमुळे?
prakash ambedkar demand investigation into shivaji maharaj statue collapse and action against the culprits
शिवरायांचा पुतळा पाडला?…. ज्यांनी हे काम….प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे….
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…

प्रकाश आंबेडकर म्हणाले, अलिकडच्या काळात औरंगजेबाला केवळ दोष दिला जातो परंतु ते वस्तुस्थितीला धरून नाही. देशात चुकीचं नरेशन सेट केलं जात आहे. जुन्या राजांचं उदाहरण देऊन हिंदू-मुस्लीम, हिंदू-जैन असं विभाजन केलं जात आहे. औरंगजेबाने देशात ५४ वर्ष राज्य केलं. त्याने सुफी परंपरा जपली. त्याच्या चांगल्या आणि वाईट बाजू आहेत. आपण चांगल्या बाजूंचं गुगगाण गायलं पाहिजे. वाईट बाजू सोडल्या पाहिजेत. आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत ते पाहिलं पाहिजे.

हे ही वाचा >> “तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरच्या वारीला येताना मटणाचा बेत!”, आमदार अमोल मिटकरींचा संताप, म्हणाले…

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मध्यपूर्वेतील मुस्लीम देशांपेक्षा जास्त मुस्लीम समुदाय भारतात राहतो, तरीदेखील सुफी पंथामुळे तिथल्या दहशतवादी संघटनांमध्ये भारतातलं कोणी गेलं नाही. १०-१२ माणसं सोडली तर इथलं कोणीच तिकडे गेलं नाही. हे जगाने मान्य केलं आहे. आपणही मान्य केलं पाहिजे.