राज्य सरकारने नुकताच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली असून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीवर विरोधकांकडून टीकादेखील करण्यात येत आहे. अशातच आता मुस्लीम समाजातील ज्या व्यक्तीला दोन पत्नी आहेत अशा कुटुंबाला आणि दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतील नियम बदलले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली घोषणा

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Hindu Sadhavi- Muslim Man Wedding
हिंदू साध्वीचा मुस्लीम पुरुषाशी विवाह? Viral फोटोमध्ये दिसणारे हे चेहरे कोण? अखेर सत्य आलं समोर
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!

काय म्हणाले प्रकाश महाजन?

प्रकाश महाजन यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. “मुस्लीम समाजात ज्या पुरुषाला दोन पत्नी आहेत किंवा ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत, असा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये”, असे ते म्हणाले. “या देशात लवकरच लोकसंख्येचा स्फोट होणार असून वाढत्या लोकसंख्येचा भार, जे लोक दोनपेक्षा जास्त अपत्य होऊ देत नाहीत, त्यांच्यावर पडतो, त्यांच्या कराचा पैसा दुसरीकडे खर्च होतो, अशा महिलांना या योजनेचा लाभ दिल्यास, खरे गरजू मागे राहतील”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली

राहुल गांधींवरही केली टीका

पुढे बोलताना त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. “राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते नेते झाले आहेत. त्यामुळे आता ते अनिर्बंध बोलू शकतात. मुळात त्यांचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही. जे मुलं हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला येतात, ते खरे हिंदू असतात”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना काय?

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. या योजनेनुसार, प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बैंक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाईल, असं अजित पवार यांनी सांगितलं होतं.