राज्यातील सध्याची करोना बाधित रुग्ण संख्या लक्षात घेता पूर्व प्राथमिक शाळा २ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच पालकांना आपलं मुल सुरक्षित राहील, अशी खात्री वाटत असेल, तरच त्यांनी मुलं शाळेत पाठवावीत, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

यावेळी अजित पवार म्हणाले की, करोना बाधित रुग्णांचा दर कमी असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ, टास्क फोर्स आणि डॉक्टर यांच्याशी चर्चा करून आता १ मार्चपासून जम्बो रूग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील करोना नियम शिथिलता बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. सध्या कोरोना आकडेवारी घट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
Satyagraha for free education in Vinoba Bhaves gagode village
विनोबा भावे यांच्या गावात मोफत शिक्षणासाठी सत्याग्रह…
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी

डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. तसेच ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराचेही रुग्ण वाढू लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध घातले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर वेगाने ओसरू लागल्यानंतर २४ जानेवारीपासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या. पालकांकडून संमतिपत्र घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. तसेच जे पालक आपल्या पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवत नाहीत त्यांच्याकरीता दृकश्राव्य माध्यमातून शाळा सुरू ठेवल्या जात आहेत. मात्र मुंबईतील करोनाचा संसर्ग पूर्णपणे ओसरत असल्यामुळे शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च २०२० मध्ये करोनाचा संसर्ग देशभरात सुरू झाल्यानंतर बंद करण्यात आलेल्या शाळा दोन वर्षांनी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. यावेळी अपंगांच्या व विशेष मुलांच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Story img Loader