ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवायचं असेल, तर भाजपाचं सरकार घालवलं पाहिजे. त्याची सुरूवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत पराभव झाला, तर विधानसभेत आव्हान राहणार नाही, असं विधान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जागावाटपावरून महाविकास आघाडीत अलबेल आहे का? असा प्रश्न विचारल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली शिवसेना ( ठाकरे गट ), राष्ट्रवादी, काँग्रेससह काही पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहोत. भाजपाच्या विरोधात एकास-एक उमेदवार उभे करू. महाराष्ट्रात तिन्ही पक्ष जागावाटपासाठी एकत्र बसू.”

gulabrao patil controversial statements marathi news
गुलाबरावांची वादग्रस्त विधानांची पाटीलकी
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Home Minister Amit Shah claims that there is no Article 370 in Kashmir again
काश्मीरमध्ये पुन्हा ‘अनुच्छेद ३७०’ नाहीच! गृहमंत्री अमित शहा यांचा दावा; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
Devendra Fadnavi
सीबीआयकडून गुन्हा दाखल होताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत म्हणाले…
Big boss marathi season 5 contestant suraj Chavans struggle kiratnkar maharaj tells youth about
“आयुष्यात जेव्हा आत्महत्येचा विचार येईल तेव्हा सुरज चव्हाणला आठवा” किर्तनकार महाराजांचा तरुणांना सल्ला; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
Sambhajiraje chhatrapati (1)
“…नंतर सरकार आणि मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये”; महिला अत्याचाराच्या घटनांवरून संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया!

“आपापल्या पक्षांची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करणार. त्यामुळे थोडी वादावादी होईल. पण, ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवण्यासाठी भाजपाचं सरकार घालवलं पाहिजे. त्याची सुरूवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत पराभव झाला, तर विधानसभेत आव्हान राहणार नाही,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

हेही वाचा : “ही धमकी आहे का, मला संपवून टाकाल का?”; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर सुषमा अंधारे आक्रमक, म्हणाल्या…

“लोकसभेत पराभव स्विकारावा लागला, तर मग विधानसभा निवडणूक होणार नाही. कारण, पुन्हा लोकशाही राहणार नाही, अशी माझी खात्री आहे,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

हेही वाचा : “महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला मिळो ही देवीचरणी प्रार्थना”, विधानसभा अध्यक्षांचं विधान चर्चेत!

‘मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं’, असं विधान ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी ललिल पाटीलनं म्हटलं. यावर प्रश्न विचारल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “तेलगी प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावं आली. नंतर ते प्रकरण दडपण्यात आलं. तसेच, सत्तेतील सरकार हे प्रकरण दडपून टाकतील. कारण, यात काही मंत्र्यांचा संबंध असल्याचं बोललं जात आहे.”