ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवायचं असेल, तर भाजपाचं सरकार घालवलं पाहिजे. त्याची सुरूवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत पराभव झाला, तर विधानसभेत आव्हान राहणार नाही, असं विधान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागावाटपावरून महाविकास आघाडीत अलबेल आहे का? असा प्रश्न विचारल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली शिवसेना ( ठाकरे गट ), राष्ट्रवादी, काँग्रेससह काही पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहोत. भाजपाच्या विरोधात एकास-एक उमेदवार उभे करू. महाराष्ट्रात तिन्ही पक्ष जागावाटपासाठी एकत्र बसू.”

“आपापल्या पक्षांची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करणार. त्यामुळे थोडी वादावादी होईल. पण, ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवण्यासाठी भाजपाचं सरकार घालवलं पाहिजे. त्याची सुरूवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत पराभव झाला, तर विधानसभेत आव्हान राहणार नाही,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

हेही वाचा : “ही धमकी आहे का, मला संपवून टाकाल का?”; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर सुषमा अंधारे आक्रमक, म्हणाल्या…

“लोकसभेत पराभव स्विकारावा लागला, तर मग विधानसभा निवडणूक होणार नाही. कारण, पुन्हा लोकशाही राहणार नाही, अशी माझी खात्री आहे,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

हेही वाचा : “महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला मिळो ही देवीचरणी प्रार्थना”, विधानसभा अध्यक्षांचं विधान चर्चेत!

‘मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं’, असं विधान ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी ललिल पाटीलनं म्हटलं. यावर प्रश्न विचारल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “तेलगी प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावं आली. नंतर ते प्रकरण दडपण्यात आलं. तसेच, सत्तेतील सरकार हे प्रकरण दडपून टाकतील. कारण, यात काही मंत्र्यांचा संबंध असल्याचं बोललं जात आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan on ed cbi loksabha and vidhansabha election ssa
Show comments