महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत शिवसेनेत बंडखोरी केली. त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. शरद पवार आणि अजित पवार अशा दोन नेत्यांबरोबर पक्षातले नेते विभागले गेले आहेत. दोन्ही गटातले नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले होते की, २०१४ मध्ये तुम्ही (भाजपाने) शिवसेना सोडल्यानंतर आम्हीपण काँग्रेस सोडू, आणि निवडणुकीनंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल, असं शरद पवार साहेबांनी भाजपासह आम्हाला सांगितलं होतं. भुजबळ यांच्या याच वक्तव्याचा दाखला देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
US will take over Gaza Strip,
गाझा पट्टी ताब्यात घेऊ!ट्रम्प यांची धक्कादायक घोषणा; अमेरिकेच्या मित्रांकडूनही विरोध
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तुम्ही छगन भुजबळ यांची मुलाखत नीट ऐकली असेल तर त्यांनी त्यात एक गोष्ट सांगितली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, त्यांचं (भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस) आधीच ठरलेलं होतं. आधी भाजपाने शिवसेनेची साथ सोडायची, मग राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची साथ सोडायची. त्यांनी असं २०१४ च्या निवडणुकीआधीच ठरवलं होतं. त्यामुळे आता तुम्ही काहीही कारणं सांगितली तरी त्याला काही अर्थ राहत नाही. त्या फुटीमुळे आघाडीचं नुकसान झालं. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी फुटली नसती तर २०१४ ला आघाडी सरकार आलं असतं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्तेत आलीच नसती.

Story img Loader