पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा समंजस कोणी असेल तर ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. यासाठी भुजबळ यांनी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचे उदाहरण दिले. जेव्हा पुलवामात हल्ला झाला त्यानंतर काही वेळातच प्रियंका गांधी यांची पहिली पत्रकार परिषद होती. मात्र ती त्यांनी रद्द केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पावणेसहा वाजता सभा घेत होते. योगी आदित्यनाथ यांनीही सभा घेतली, तर अमित शाह यांनीही सभा घेतली आणि आमचे मुख्यमंत्री युतीच्या वाटाघाटी करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. आता मला सांगा समंजस कोण आहे? असा प्रश्न भुजबळांनी विचारला. नांदेडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा