पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आले. या दौऱ्यात मोदींनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. तसेच निळवंडे धरणाच्या कालव्यांचं लोकार्पण केलं. यानंतर शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दर्शन रांग इमारतीचं उद्घाटन केलं. यावेळी शिर्डीतील काकडी येथे नमो शेतकरी महासन्मान मेळाव्याचं आयोजन केलं. तेथे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटा घालून आणि भेटवस्तू देत पंतप्रधान मोदींचा सन्मान केला. यानंतर बोलताना विखेंनी मोदींसमोर महाराष्ट्रातील दुष्काळाचा उल्लेख करत भाष्य केलं.

“बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत”

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “विश्वनेता, लोकप्रिय पंतप्रधान आमच्या भागात आले आहेत. यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. यापेक्षा अधिक अभिमानाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. यामुळे मला फार आनंद झाला आहे. तो आनंद मी व्यक्त करू शकत नाही.”

RBI Governor statement on exchange rate policy
रुपयाला सावरण्यासाठी थेट हस्तक्षेप नाही – मल्होत्रा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pune Municipal Corporation is losing revenue due to income tax defaulters worth crores of rupees Pune print news
बड्यांची थकबाकी, सामान्यांना भुर्दंड, नक्की काय आहे प्रकार! कोट्यवधींचा कर थकल्याचा मूलभूत सुविधानिर्मितीला फटका
US will take over Gaza Strip,
गाझा पट्टी ताब्यात घेऊ!ट्रम्प यांची धक्कादायक घोषणा; अमेरिकेच्या मित्रांकडूनही विरोध
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
Economist Politics Delhi Elections Prime Minister
‘रेवडी’चे राजकीय वजन संपले ?
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण

“पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राधाकृष्ण विखेंकडून महाराष्ट्रातील दुष्काळावर भाष्य”

“महाराष्ट्रात आज दुष्काळी परिस्थिती आहे. मी देवेंद्र फडणवीसांना याबाबत सांगितलं आहे. माझ्या वडिलांनी आणि गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेची स्थापना केली होती. यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्हा, नाशिक, मराठवाडा या भागाला पाणी देण्याविषयी त्यांनी मांडणी केली होती. त्याविषयी फडणवीस बोलतील,” असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केलं.

“…म्हणून आम्ही मोदींबरोबर जाण्याचा निर्णय घेतला”

दरम्यान, या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, “गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितली तर ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत आहे. महाराष्ट्राने कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र छातीचा कोट करून राष्ट्राबरोबर उभा राहिला. हा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वारंवार मांडली होती. त्याच भूमिकेतून आज मोदी राष्ट्र बळकट करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : “मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, कारण…”; गुणरत्न सदावर्तेंची आक्रमक मागणी, म्हणाले…

“५३ वर्षे कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम”

“माझं आजोळ नगर जिल्हा आहे. मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं. निवडणुका आल्या की, नारळ फोडायचा आणि आम्ही आता निळवंडे करणार असं सांगितलं गेलं. बघता बघता तीन पिढ्या यात गेल्या. हे साडेआठ टीएमसीचं धरण आहे. पावणेदोन लाख एकर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येईल,” असं अजित पवारांनी सांगितलं.

Story img Loader