सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागण्याची शक्यता आहे. अशात महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे-पाटील यांना लॉटरी लागण्याची चर्चा सुरू आहे. त्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबद्दल एक विधान केलं आहे. ‘माझी छाती फाडून बघितली तरी त्यातही राधाकृष्ण विखे-पाटीलच दिसतील’, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार?

“जशी हनुमानाने छाती फाडून भगवान श्रीराम दाखवले, तशी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटीलच दिसतील. विखे-पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत, असं मला वाटतं. कुणाला नाही वाटत आपला मित्र मोठा व्हावा. मात्र, माझ्या मित्राला ( विखेंना ) अडचण होईल, असं प्रश्न त्यांना विचारू नका. मी सुद्धा अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही,” असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं.

व्यक्तिवेध: एस. राधाकृष्णन
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
review of impact on india stock market and economy after donald trump comes to power
Money Mantra : ट्रंप यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे आपलं आयुष्य का बदलणार?
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Congress MLAs praises of Haryana CM Saini
Congress : हरियाणा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? दोन आमदारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
What is the reason behind the Sensex fall that cost investors Rs 7 lakh crore
मार्केट वेध: सेन्सेक्सची १२०० अंशाहून मोठी आपटी; गुंतवणूकदारांच्या ७ लाख कोटींचा फटका देणाऱ्या घसरगुंडी मागील कारण काय?

“मुख्यमंत्री बदलणे किंवा त्याबद्दल दावा करण्याची चर्चा…”

यावर आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाष्य केलं आहे. “अब्दुल सत्तार माझे जवळचे मित्र असून, भावनिक आहेत. भावनेच्या भरात ते बोलले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तमरित्या काम करत आहोत. मुख्यमंत्री बदलणे किंवा त्याबद्दल दावा करण्याची चर्चा व्यर्थ आहेत,” अशी स्पष्टोक्ती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

“हनुमानाचं नाव घेण्याचा अधिकार सत्तारांना नाही”

“अब्दुल सत्तारांच्या पोटातलं ओठावर आलं आहे. त्यांच्या पोटात शिजत असेल, ते सत्तारांनी बोलून दाखवलं. कुंकू एकाचं लावायचं, लग्न एकाबरोबर करायचं आणि राहायचं एकाबरोबर अशी परिस्थिती सत्तार यांची झाली आहे. हनुमानाचं नाव घेण्याचा अधिकार सत्तारांना नाही. त्यांच्या छातीत खूपजण निघतील,” असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लगावला आहे.

Story img Loader