शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यावर पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण, शुक्रवारी ( ५ मे ) पक्षनेते आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर निवृत्तीचा निर्णय मागे घेत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहत असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. यानंतर शरद पवार आज ( ८ मे ) सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा ‘महाराष्ट्राचं चित्र कसं बदलता येईल, हे मी ठरवलं आहे,’ असं विधान शरद पवारांनी केलं आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “वेगाने महाराष्ट्राचं चित्र बदलता कसं येईल, याची काळजी घेणं मी ठरवलं आहे. तसेच, सोलापुरातील चित्र बदलण्यासाठी लक्ष घालावं लागेल. आम्हाला काम करावं लागेल. लोकांच्या सुख दुख:त सहभागी व्हावं लागेल आणि ते आम्ही करू. पण, ते केल्याशिवाय अपेक्षा करणे योग्य नाही.”

ajit pawar
राजापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; अजित यशवंतराव शिवसेना ठाकरे गटात दाखल
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
sanjay raut
“वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं,आता हिंदुत्त्वाचा गब्बर…”; इद्रीस नायकवाडींच्या शपथविधीवरून संजय राऊतांचं टीकास्र!
manoj jarange patil criticized devendra fadnavis
“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले…
Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य; “वय ८४ होऊ द्या, ९० होऊ द्या हे म्हातारं थांबत नाही, महाराष्ट्राला…”
natasha awhad post on baba siddique murder
“लॉरेन्स बिश्नोई गँगने माझ्या बाबांनाही…”; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची पोस्ट चर्चेत!
Baba Siddique firing, What Doctor Jalil Parkar Said?
Baba Siddique : “बाबा सिद्दीकींना छातीवर दोन गोळ्या लागल्या, ज्या…” ; डॉ. जलील पारकर यांची महत्त्वाची माहिती
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!

हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार अन्…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं विधान

“राज्यात आणि देशात भाजपाच्या विरोधात जनतेला सत्ताबदल हवा आहे. सर्वत्र फिरताना जनतेची हीच भावना दिसून येते. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आता सर्व विरोधकांनीही एकत्र येण्याची आत्यंतिक गरज आहे. त्यादृष्टीने विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी आपणही प्रयत्नशील आहोत,” असेही शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “नाना पटोले राजकारणातील कमी बुद्धी असलेले प्रदेशाध्यक्ष, ज्याला…”, शहाजीबापू पाटलांची टीका

“थापांना जनता बळी पडणार नाही”

‘महाराष्ट्राचं चित्र कसं बदलता येईल, हे मी ठरवलं आहे,’ शरद पवारांच्या या वक्तव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. “शरद पवारांनी चित्र बदलण्याचं स्वप्न दाखवलं आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. अशा थापांना जनता बळी पडणार नाही. कुटुंब-कुटुंबात भांडणं कुणी लावली? सहकार चळवळ कुणी संपुष्टात आणली? खासगीकरणाला कोण वाव देत आहे? लोकांना हे समजत नाही का?,” असे सवाल उपस्थित करत राधाकृष्ण विखे-पाटलांनी शरद पवारांवर शरसंधान साधलं आहे.