शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यावर पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण, शुक्रवारी ( ५ मे ) पक्षनेते आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर निवृत्तीचा निर्णय मागे घेत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहत असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. यानंतर शरद पवार आज ( ८ मे ) सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा ‘महाराष्ट्राचं चित्र कसं बदलता येईल, हे मी ठरवलं आहे,’ असं विधान शरद पवारांनी केलं आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “वेगाने महाराष्ट्राचं चित्र बदलता कसं येईल, याची काळजी घेणं मी ठरवलं आहे. तसेच, सोलापुरातील चित्र बदलण्यासाठी लक्ष घालावं लागेल. आम्हाला काम करावं लागेल. लोकांच्या सुख दुख:त सहभागी व्हावं लागेल आणि ते आम्ही करू. पण, ते केल्याशिवाय अपेक्षा करणे योग्य नाही.”

Ranveer Allahbadia News
Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य, “समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांना माफ करता कामा नये, त्यांना..”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Prasad Khandekar
“अमेरिकेत…” प्रसाद खांडेकरने सांगितला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या नावाचा विनोदी किस्सा; म्हणाला, “नमा मला एक चिक्की…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
rahul solapurkar on chhatrapati shivaji maharaj
Rahul Solapurkar: छत्रपती शिवरायांबाबतच्या ‘त्या’ विधानावर राहुल सोलापूरकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “लाच हा शब्द…”
What Historian Inderjit Sawant Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी महाराष्ट्राचं मन दुखावलं आहे, माफी मागितली पाहिजे; इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची मागणी
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra kesari Kaka Pawar on Shivraj Rakshe About Controversy
Maharashtra Kesari: “महाराष्ट्र केसरीच्या पंचांना जन्मठेप देणार का?” शिवराज राक्षेच्या निलंबनानंतर कुस्ती प्रशिक्षकांचा संतप्त सवाल, नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार अन्…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं विधान

“राज्यात आणि देशात भाजपाच्या विरोधात जनतेला सत्ताबदल हवा आहे. सर्वत्र फिरताना जनतेची हीच भावना दिसून येते. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आता सर्व विरोधकांनीही एकत्र येण्याची आत्यंतिक गरज आहे. त्यादृष्टीने विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी आपणही प्रयत्नशील आहोत,” असेही शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “नाना पटोले राजकारणातील कमी बुद्धी असलेले प्रदेशाध्यक्ष, ज्याला…”, शहाजीबापू पाटलांची टीका

“थापांना जनता बळी पडणार नाही”

‘महाराष्ट्राचं चित्र कसं बदलता येईल, हे मी ठरवलं आहे,’ शरद पवारांच्या या वक्तव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. “शरद पवारांनी चित्र बदलण्याचं स्वप्न दाखवलं आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. अशा थापांना जनता बळी पडणार नाही. कुटुंब-कुटुंबात भांडणं कुणी लावली? सहकार चळवळ कुणी संपुष्टात आणली? खासगीकरणाला कोण वाव देत आहे? लोकांना हे समजत नाही का?,” असे सवाल उपस्थित करत राधाकृष्ण विखे-पाटलांनी शरद पवारांवर शरसंधान साधलं आहे.

Story img Loader