काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. राष्ट्रमाता जिजाऊ असा उल्लेख करत जिजाऊंनीच शिवाजी महाराजांना मार्ग दाखवला, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. तसेच मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की, महाराष्ट्राच्या जनतेने मला इतकं प्रेम दिलं, इतकी शक्ती दिली आणि इतकं ज्ञान दिलं, असंही त्यांनी नमूद केलं. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमधील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, “शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला मार्ग दाखवला. ही त्या शिवाजी महाराजांची भूमी आहे. आई मुलाला मार्ग दाखवते. शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कोणी बनवलं? ते शिवाजी महाराज कसे झाले? हे शिवाजी महाराज नेमके काय होते? हो, ते एक व्यक्ती होते. मात्र, ते केवळ एक व्यक्ती नव्हते. त्यांच्यात आणि आपल्यात एक फरक आहे. तो फरक म्हणजे ते महाराष्ट्राचा आवाज होते.”

What Historian Inderjit Sawant Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी महाराष्ट्राचं मन दुखावलं आहे, माफी मागितली पाहिजे; इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
Pratik Gandhi recalls his first kissing scene with senior actor Vidya Balan
विद्या बालनबरोबर केला पहिला किसिंग सीन, बॉलीवूड अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “ती खूप…”
Rahul Solapurkar Shivaji Maharaj
“मिठाईचे पेटारे नव्हते, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले”, मराठी अभिनेत्याच्या वक्तव्याने वादंग
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”

“शिवाजी महाराजांना मार्ग दाखवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं”

“जनतेच्या मनातील सर्व भावना शिवाजी महाराजांच्या मनात होत्या. त्यांना मार्ग दाखवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं. आज आम्ही त्यांचंही स्मरण करतो. जे शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांनी म्हटलं तेच काम ही भारत जोडो यात्रा करत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या यात्रेला पुरेपुर प्रेम दिलं. ३,५०० किमी चालणं सोपं काम नाही. मात्र, जनतेने हे काम सोपं केलं,” असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “राहुल गांधींच्या वक्तव्याने मविआत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले, “सावरकरांबद्दल…”

“मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही”

“जनतेने प्रेम केलं, मदत केली, आम्हाला खूप शिकवलं. त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की, महाराष्ट्राच्या जनतेने मला इतकं प्रेम दिलं, इतकी शक्ती दिली आणि इतकं ज्ञान दिलं,” असंही राहुल गांधींनी नमूद केलं.

Story img Loader