एकनाथ शिंदे यांनी एक वर्षापूर्वी शिवसेनेत बंड केलं होतं. या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी यांनी १६ आमदारांना अपात्र केलं होतं. त्याविरोधात शिवसेनेनं ( ठाकरे गट ) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र, अद्यापही विधानसभा अध्यक्षांनी यावर निकाल दिला नाही. पण, अपात्रतेबाबत कधीपर्यंत निर्णय देणार? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मुंबई तक’शी बोलत होते.

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सांगितलं की, निर्धारित वेळत याचा निर्णय द्यावा. लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही. संवैधानिक आणि नियमांचे पालन करून अपात्रतेबाबत आम्ही निर्णय देऊ,” असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार

हेही वाचा : “मागच्या वर्षी ५१ आमदारांनी शरद पवारांना भाजपाबरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण…”, प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

जून महिन्यात राजकीय पक्ष कोणाकडे होता? हे पाहण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यावर आतापर्यंत कोणता निर्णय घेतला गेला? असे विचारल्यावर राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “राजकीय पक्ष कोणता आहे, हे पहिल्यांदा आम्हाला पहावे लागेल. त्यानंतर शिवसेना पक्षाचे नेतृत्व कोण करते आहे? पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे नेतृत्व योग्य आहे का? हे पाहूनच आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. निर्णय घेताना घाईही करणार नाही. आणि विलंबही लावणार नाही.”

हेही वाचा : प्रदेशाध्यक्ष आणि प्रतोदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला? उज्ज्वल निकम म्हणाले…

दरम्यान, शिवसेना ( ठाकरे गट ) प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना लवकरात-लवकर निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सुनील प्रभू यांनी याचिकेत केली आहे.