विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या १४ आमदारांना पात्र ठरवल्याने शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देताना शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील आमदारांना पात्र ठरवलं आहे. ठाकरे गटातील सर्व १४ आमदारांना आणि शिंदे गटातील १६ आमदारांना पात्र ठरवलं आहे. परंतु, ठाकरे गटाच्या आमदारांनी पक्षादेशाचा भंग केल्याचा दावा करत त्यांना अपात्र ठवण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. यासाठी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालय आता या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा