पक्षांतर बंदी झाली की नाही, हा निर्णय आदित्य ठाकरे घ्यायचा नाही. तर, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे, असा टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. विधिमंडळात संख्याबळ नसेल, तरच सरकार कोसळेल, असेही राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं. ते सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल नार्वेकर म्हणाले, “सरकार पडणार की नाही, हे सभागृहातील बहुमतावर अवलंबून आहे. कुणाच्याही भविष्यवाणीकडे पाहण्याची मला आवश्यकता नाही. कारण, संविधानात सरकार पडणे आणि टिकण्याबद्दल तरतुदी आहेत. संख्याबळ असेल, तर सरकार टिकते. विधिमंडळात संख्याबळ नसेल, तरच सरकार कोसळेल.”

jitendra awhad allegation maharashtra government
“शिंदे सरकारने किक्रेटपटूंना जाहीर केलेलं बक्षीस अद्यापही दिलं नाही”; जितेंद्र आव्हाडांचा दावा!
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Loksatta article A Comprehensive Review of Income Tax Law
लेख: क्लिष्टतांचे तिमिर जावो… कायदा सोपा होवो!
manoj jarange patil criticized devendra fadnavis
“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले…
Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
vijay wadettiwar mahatma phule
“महात्मा फुलेंनी लिहिलेल्या ओळी या सरकारने बदलल्या”, वडेट्टीवारांकडून पुराव्यासह…
sadhguru jaggi vasudev isha foundation
“आम्ही कुणालाही लग्न करायला वा संन्यासी व्हायला सांगत नाही”, जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’चं ‘त्या’ आरोपांवर स्पष्टीकरण!
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी

“…हे संविधानाने दिलेल्या तरतुदीच्या विरोधात आहे”

“हे सरकार संविधानाच्या तरतुदीनुसार निवडून आलं आहे. सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे. सरकार पडेल, अशी भविष्यवाणी करणं, हे संविधानाने दिलेल्या तरतुदीच्या विरोधात आहे,” असंही नार्वेकरांनी सांगितलं.

“…तर उचित कारवाई करेन”

“पक्षांतर बंदी झाली का नाही, हा निर्णय आदित्य ठाकरेंना घ्यायचा नाही. हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. त्यामुळे मी विधानसभा अध्यक्ष असल्याने सर्व नियम, संवैधानिक आणि १० व्या अनुसूचीनुसार तरतुदींचं पालन करून अपात्रतेचा निर्णय घेणार आहे. कुठेही पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन झाले असेल, तर उचित कारवाई करेन,” असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं.