अलिबाग: रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली. त्यामुळे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहेत. यात तीन अनंत गीते नामक उमेदवारांचा समावेश आहे. रायगड लोकसभा मतदार संघासाठी २८ उमेदवारांची ४० नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी छाननी दरम्यान सात उमेदवारांचे अवैध ठरले. त्यामुळे २१ उमेदवारांची २८ नामनिर्देशनपत्र शिल्लक राहीली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ जणांनी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली. त्यामुळे अंतिमतः १३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले आहेत.

हेही वाचा : सोलापुरात २१ तर माढ्यात ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
announcement , MMC election, MMC ,
एमएमसीच्या निवडणुकीमध्ये सावळागोंधळ, निवडणूक जाहीर होऊन १४ दिवस उलटल्यानंतरही उमेदवार अर्जाविनाच
former MLA ratnagiri Rajan Salvi subhash bane Ganpat Kadam
राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन आमदार…
pune s praveen kamble tops maharera exam 6755 candidates pass in maharashtra
‘रेरा’च्या परीक्षेत पुण्याचा प्रवीण कांबळे प्रथम! राज्यात ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण; मुंबईतील ८४ वर्षीय व्यक्तीचेही यश
non creamy layer, UPSC , OBC , OBC Candidates job,
यूपीएससी उत्तीर्ण ओबीसी उमेदवार सरकारी अनास्थेचे बळी, हे आहे कारण
Chandrapur District Bank Recruitment Late night distribution of appointment letters to eligible candidates
रात्रीस खेळ चाले…चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीतील पात्र उमेदवारांना रात्री उशिरा नियुक्तीपत्रांचे वाटप
waqf board amendment bill 2024
Waqf Board Bill: वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या १२ सुधारणा मंजूर, विरोधकांच्या सर्व सुधारणा फेटाळल्या!

सोमवारी आस्वाद जयदास पाटील- शेकाप, सुनील दत्ताराम तटकरी, अभिजीत अजित कडवे, नंदकुमार गोपाळ रघुवीर, मिलिंद काशिनाथ कांबळे, विजय गोपाळ बना, गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, अस्मिता अश्विन उंदीरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे अनंत गिते(अपक्ष) अनंत बाळोजी गिते(अपक्ष) अनंत गंगाराम गिते(शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), नितीन जगन्नाथ मयेकर (अपक्ष), मंगेश पद्माकर कोळी(अपक्ष) प्रकाश बाळकृष्ण चव्हाण (भारतीय जवान किसान पार्टी) पांडूरंग दामोदर चौले (अपक्ष), सुनील दत्तात्रेय तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्रीनिवास सत्त्यनारायण मट्टरपती(अपक्ष), अजय यशवंत उपाध्ये(अपक्ष), अंजली अश्विन केळकर (अपक्ष), अमित श्रीपाल कडवे(अपक्ष), कुमूदिनी रविंद्र चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) असे तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहेत. यात तीन अनंत गीते नामक उमेदवारांचा समावेश आहे. गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले असले तरी, सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका उमेदवारानी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Story img Loader