अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. या छाननीमध्ये सात उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता २१ उमेदवारांचे २७ उमेदवारी अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी दुपारी संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीत अखेर २८ उमेदवारांनी आपली ४० नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. या सर्व नामनिर्देशन पत्रांची शनिवारी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा उपस्थितीत होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी छाननी केली. सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले त्यामुळे निवडणुकीसाठी आता २१ उमेदवार पात्र ठरले आहेत.

हेही वाचा : “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…

SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune crime news
महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई निलंबित, विवाहास नकार देऊन पाच लाख, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
SEBI
सेबीकडून चार Stock Brokers ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द, जाणून घ्या तुमच्याही ब्रोकरचा आहे का समावेश?
BJP vs Congress which political party has bigger bank balance
BJP vs Congress : भाजपा आणि काँग्रेस… दोन्ही पक्षांच्या बँक बॅलन्समध्ये नेमका फरक किती? निवडणूक आयोगाच्या डेटामधून समोर आली माहिती
Motor Accident Claims Tribunal , vacancies ,
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदे कधी भरणार ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
rahul gandhi mallikarjun kharge (1)
देणग्यांच्या बाबतीतही काँग्रेस पिछाडीवर; वर्षभरात जमा झाला १,१२९ कोटींचा निधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दाखल सुनील तटकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने अनिकेत तटकरे यांनी दाखल केलेला डमी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. तर उर्वरित सहा उमेदवारांचे अर्ज शपथपत्र अपुरे असल्याने अवैध ठरले. अनिकेत सुनील तटकरे ( नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), नरेश गजानन पाटील(अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (बहुजन समाज पार्टी), उस्मान बापू कागदी (अपक्ष), अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी), भुपेंद्र नारायण गवते (अपक्ष), घाग संजय अर्जुन (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद ठरवण्यात आले. पात्र ठरलेल्या उमेदवारांना २२ एप्रिलपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

Story img Loader