लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : जिल्ह्यात सध्या सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक पाऊस झाला आहे. माण खटाव या दुष्काळी तालुक्यातही मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
27th September Rashi Bhavishya
२७ सप्टेंबर पंचांग: पंचांगानुसार राशींच्या कुंडलीत शिवयोग काय…
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Aaditya Thackeray On Mumbai University Senate Election 2024
Aaditya Thackeray : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० जागांवर विजय, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “इथूनच विजयाचा…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sandip Ghosh
Sandip Ghosh R G Kar Hospital : “आरोप सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते”, संदीप घोष यांचा जामीन फेटाळताना न्यायालयाने नोंदवलं महत्वाचं निरीक्षण

जिल्ह्यात मागीलवर्षी पाऊस कमी होता. पश्चिम भागातील प्रमुख आणि मोठे पाणी प्रकल्पही भरले नव्हते. कोयनेसारख्या १०५ टीएमसीच्या धरणातही जेमतेम पाणीसाठा होऊन ९५ टक्क्यांपर्यंतच धरण भरले होते. इतर धरणेही पूर्ण नव्हती. परंतु, यावर्षी जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा झाली आहे. मागील वर्षी महाबळेश्वरलाही आज ९१.०६ मिमी पाऊस झाला. मागील वर्षीपेक्षा ८८२ मिलिमीटर पाऊस अधिक झाला. आतापर्यंत ६ हजार ४४६ मिलिमीटर (२५३.७८० इंच) पाऊस झालेला आहे. मागील वर्षी (५७८०.३०मिमी) (२२७.५७१ इंच) पाऊस झाला होता.

आणखी वाचा-विठ्ठलाच्या पूजेसाठी १ पासून ‘ऑनलाईन’ नोंदणीची सोय; पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित

जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगलाच पाऊस होत आहे. माण खटाव या दुष्काळी तालुक्यातही मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दुपारी धो धो पावसाने मायणीकरांना (ता. खटाव) अक्षरशः झोडपून काढले. येथील नैसर्गिक ओढ्यां – नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे व मनमानी अतिक्रमणामुळे पुराचे पाणी नागरी वस्त्या व दुकानांमध्ये घुसून लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओढ्या नाल्यालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये रहिवाशी धास्तावले आहेत.

सलग चौथ्या दिवशी मायणीला पावसाने झोडपले. आज दुपारी सुमारे दीड ते चार वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पावसाचा सर्वाधिक फटका ओढ्यालगत असलेल्या नागरी वस्तीला बसला. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. दुकानांमध्येही पुराचे पाणी घुसून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच ओढ्यालगतच्या शेतामध्येही पाणी घुसून वेगाने वाहून गेल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे. या पावसाने उरमोडी, तारळी, कण्हेर, धोम, बलकवडी व कास तलाव आणि छोटे मोठे तलाव भरले आहेत.