विजय पाटील

कराड : पश्चिम घाटक्षेत्रात यंदा सर्वाधिक पाऊस पाटण तालुक्यातील पाथरपुंजला की वाई तालुक्यातील जोर येथे होणार हे आतातरी सांगणे शक्य होणार नाही. जुलैच्या अखेरच्या सप्ताहात जोर येथे सर्वाधिक पावसाची नोंद होती. आजमितीला मात्र, जोरला मागे टाकत पाथरपुंजला उच्चांकी ५,४४० मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. तर, जोर येथे ५,४०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
leopard was died after being hit by unknown vehicle at Kosdani Ghat on Nagpur-Tuljapur National Highway
यवतमाळ : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

कोयना धरणात आजवर धरण क्षमतेच्या ९४.१४ टक्के (९९.०९ टीएमसी) पाण्याची आवक होताना, वीजनिर्मितीसाठी सुमारे १० टीएमसी पाणी वापरात येऊन त्याचा धरणातून विसर्ग झाला आहे.  कोयना धरणाच्या पाणलोटात एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत जवळपास ८७ टक्के पाऊस कोसळला आहे.सध्या धरणाच्या दरवाजातून व पायथा वीजगृहातून एकूण २१,५१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यंदाही पावसाचा लहारीपणा दिसून आला आहे. जून महिन्यात अत्यल्प पाऊस होताना, जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात सलग जोरदार पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील जलचित्रच पालटून गेले. तळाशी असलेले जलसाठे समाधानकारक वधारताना खरीप हंगामाला पोषक पाऊस झाल्याने बळिराजाही आनंदला गेला आहे. दरम्यान, गेल्या ८-१० दिवसांतील जोरदार व दमदार पावसाने धरणसाठे काठोकाठ भरताना, बहुतेक धरणांमधून जलविसर्ग होताना नद्या दुथडी भरून वाहिल्या.  एकूणच आजवरचा पाऊस सर्वसामान्यांना व शेतकरी वर्गाला सुखावणारा ठरला आहे. परंतु, पावसाळय़ाचा उत्तरार्ध बाकी असून, त्यात वरुणराजाची काय कृपा राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader