सांगली : दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी सायंकाळी मिरज परिसरात पावसाने हजेरी लावली. पाऊस तुषार स्वरुपात पडला असला तरी फुलोऱ्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षाला धोका निर्माण झाला आहे. गेले दोन दिवस ढगाळ हवामान आहे. बुधवारी तर दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली आहे. जिल्ह्याचे तपमान किमान २२ तर कमाल ३२ सेल्सियस आहे. आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पाऊस तुषार स्वरुपात झाला. यामुळे फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष घडाच पाणी साचून दावण्याचा धोका वाढला आहे. तर हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असली तरी शाळूला हलका पाऊस व ढगाळ हवामान लाभदायी ठरणार आहे.

Story img Loader