महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढापाडव्या दिवशी शिवतीर्थावरून केलेल्या भाषणानंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आणि या भाषणावर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील आल्या. त्यावर काल ठाण्यात झालेल्या मनेसेच्या उत्तरसभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. शिवाय, हिंदुत्वावर आक्रमक भूमिका घेतली. पंतप्रधआन मोदींचे कौतुक करताना उत्तर प्रदेशातील विकासावर देखील भाष्य केलं. या पार्श्वभूमीवर मनसे ही भाजपाची सी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सुरू झाली आहे. या टीकेवर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा