विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (१७ जुलै) सुरू होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात एरव्ही सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याची चिंता असते. परंतु यंदा अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड, त्यामुळे बदलेली राजकीय समीकरणं, विधान परिषदेत विरोधकांचं घटलेलं संख्याबळ यामुळे उद्यापसून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी बिनधास्त आहेत. याउलट आपले अस्तित्व दाखवून सरकारची कोंडी करण्याचं मोठं आव्हान विरोधकांपुढे असेल. आगामी अधिवेशनातून राज्यातील जनतेला काय मिळेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

राज ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. चिपळूण, दापोली येथे ते महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे मेळावे घेत आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. काही वेळापूर्वी राज ठाकरे एका बैठकीसाठी जात असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना थांबवून काही प्रश्न विचारले. परंतु राज ठाकरे यांनी फार बोलणं टाळलं. ते म्हणाले, राज्यात कुठल्या प्रकारचं राजकारण सुरू आहे? त्यांना (सत्ताधारी – विरोधक) जर असं वाटत असेल हे राजकारण आहे तर भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल? आपण सगळेजण याचा साधा विचार तरी करतोय का? कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केवळ सत्तेचं आणि स्वार्थाचं राजकारण सुरू आहे, हे फार घाणेरडं आहे.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे सध्या तडफडत आहेत कारण… किरीट सोमय्यांनी थेट…
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

यावेळी राज ठाकरे यांना ठाकरे यांना विचारण्यात आलं की, आगामी विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? यावर राज ठाकरे यांनी केवळ ‘घंटा’ असं म्हणत ते तिथून निघून गेले.

हे ही वाचा >> “पक्षात आत्ता दोन गट, परंतु भविष्यात…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य चर्चेत

रत्नागिरीतल्या दापोली येथे काल (शनिवारी) राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की, सध्या जे काही राजकारण राज्यात सुरु आहे ते भयंकर आहे. पुढे बघा आणखी किती ते गलिच्छ होतंय. हम करे सो कायदा अशी राज्यातली स्थिती आहे. अजूनही निवडणुका लागत नाही. कुणीही यावर काही बोलत नाही. मोबाइल फोन, सोशल मीडिया नावाचं जे माध्यम आलं आहे त्यावर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. पूर्वी लोक रस्त्यावर उतरायचे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायचे. आत्ता असं काही घडत नाही. मोबाईलवर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. लोक जोवर रस्त्यावर उतरत नाहीत तोवर हे राजकारण वठणीवर येणार नाहीत.

Story img Loader