राज ठाकरेंनी आज गुढी पाडवा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. आज राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी आपण शिवसेना प्रमुख वगैरे काहीही होणार नाही हेदेखील स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे मी स्वार्थाचं राजकारण केलं नाही असं राज ठाकरे म्हणाले.

मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर

अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात आलं. मग मला असे वाटतेचा एपिसोड कसा पुढे न्यायचा? मग राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. माझ्या घरी ३२ आमदार, सहा सात खासदार एकत्र बाहेर पडू वगैरे ठरलं होतं. मी नावं घेत नाही. मी त्यांना सांगितलं मला पक्ष फोडून काहीही करायचं नाही. माझ्या मनात विचार नाही. पण मी पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढेन. ही गोष्ट मी माझ्या मनाशी खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरेंशिवाय यांच्याशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती. पण त्याला काही कळलंच नाही असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. मी महाराष्ट्र निर्माण सेना हे अपत्य जन्माला घातलं आहे. मी याच पक्षाचा प्रमुख राहणार असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

मी विश्वास टाकला तर टोकाचं प्रेम करतो

“मी जर एखाद्यावर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो. तर राग आला तर मी टोकाचा विरोध करतो. पण जेव्हा चांगल्या गोष्टी मोदींनी केल्या तेव्हा मी अभिनंदनही केलं. गेल्या पाच वर्षांत ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याचं स्वागत केलं आहे. जी गोष्ट योग्य ती अयोग्य ही माझी भूमिका आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एका प्रांताचा विचार केला तेव्हा मी त्यांच्यावर टीका केली. मी व्यक्तिगत टीका केली नव्हती, भूमिकेला विरोध केला होता.”

उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

“आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर करत आहेत, तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं. मला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधात बोलत आहेत. जेव्हा मी बोलत होतो तेव्हा खिशातले राजीनामे काढून माझ्याबरोबर का आला नाहीत? त्यावेळी सत्तेतून मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना? आज यांना या गोष्टी सुचत आहेत. याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून आणि तुम्हाला सत्तेतून हाकलवलं म्हणून. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या गोष्टी केल्या. मी भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला. मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून विरोध केला नाही” असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

Story img Loader