राज्यात जून २०२२ रोजी अभूतपूर्व राजकीय घटना घडली. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी फूट पाडून भाजपासोबत हातमिळवणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि परिणामी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं. तेव्हापासून राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडाला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोवर राष्ट्रवादीतही तशी फूट पडली. यामुळे विरोधी बाकावर असलेले अजित पवार थेट उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत सामील झाले. त्यामुळे, जो पक्ष सत्तेत आहे, तोच पक्ष विरोधातही आहे असं विचित्र चित्र निर्माण झालं आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा